शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एकलहरेची नुकसानीची भरपाई प्रकल्पाकडूनच

By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST

नाशिकजवळील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असेल, तर त्याची भरपाई प्रकल्पाकडूनच केली जाईल,

मुंबई : नाशिकजवळील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असेल, तर त्याची भरपाई प्रकल्पाकडूनच केली जाईल, असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधानसभेत दिली. माजी मंत्री छगन भुजबळ आणि इतर सदस्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकल्पातील कोळशाच्या राखेमुळे नागरिक त्रस्त असून, विहिरींमध्ये रासायनिक अंश सापडल्याचा मुद्दा भुजबळ यांनी मांडला. भुजबळ गेली १० वर्षे नाशिकचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर काय केले, असा चिमटा भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी काढला़ मात्र प्रश्नाला रामदास कदम उत्तर देत असताना फरांदे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्याने त्यांचा नवखेपणा जाणवला.या औष्णिक वीज प्रकल्पाने त्यांच्या प्रत्येक धुरांड्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर ही यंत्रणा बसवलेली आहे. या उद्योगाची पाहणी केली असता धुरांड्यामधून निघणाऱ्या धुलीकणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी संयुक्त आराखडा राबविण्यास सांगितले होते, त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. मंडळाने या प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रण सुधारणेसाठी १ कोटी २० लाख रुपयांची बँक हमी जमा करवून घेतली होती. मात्र संमतीपत्रातील अटींचे उल्लंघन झाल्याने त्यापैकी ५० लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)