शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

एकलहरेची नुकसानीची भरपाई प्रकल्पाकडूनच

By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST

नाशिकजवळील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असेल, तर त्याची भरपाई प्रकल्पाकडूनच केली जाईल,

मुंबई : नाशिकजवळील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असेल, तर त्याची भरपाई प्रकल्पाकडूनच केली जाईल, असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधानसभेत दिली. माजी मंत्री छगन भुजबळ आणि इतर सदस्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकल्पातील कोळशाच्या राखेमुळे नागरिक त्रस्त असून, विहिरींमध्ये रासायनिक अंश सापडल्याचा मुद्दा भुजबळ यांनी मांडला. भुजबळ गेली १० वर्षे नाशिकचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर काय केले, असा चिमटा भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी काढला़ मात्र प्रश्नाला रामदास कदम उत्तर देत असताना फरांदे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्याने त्यांचा नवखेपणा जाणवला.या औष्णिक वीज प्रकल्पाने त्यांच्या प्रत्येक धुरांड्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर ही यंत्रणा बसवलेली आहे. या उद्योगाची पाहणी केली असता धुरांड्यामधून निघणाऱ्या धुलीकणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी संयुक्त आराखडा राबविण्यास सांगितले होते, त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. मंडळाने या प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रण सुधारणेसाठी १ कोटी २० लाख रुपयांची बँक हमी जमा करवून घेतली होती. मात्र संमतीपत्रातील अटींचे उल्लंघन झाल्याने त्यापैकी ५० लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)