शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
3
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
4
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
5
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
6
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
7
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
8
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
9
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
10
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
11
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
12
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
13
Astrology Predictions 2026 : ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
15
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
16
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
17
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
18
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
19
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
20
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा मार्गाचे चौपदरीकरण दीड वर्षात

By admin | Updated: June 6, 2017 06:25 IST

डिसेंबर २०१८पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणारच, असा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पुढील टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन २३ जूनला करण्यात येणार असल्याची घोषणा करत डिसेंबर २०१८पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करणारच, असा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दुर्घटनेनंतर केवळ १६५ दिवसांत काम पूर्ण केलेल्या नवीन सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यासह कोकणातील रस्ते विकासासाठी मंजूर केलेल्या ९९०० कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे कोकण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत भविष्यात कोकण विकासाचे श्रेय नितीन गडकरी यांनाच जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, खासदार अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते. सावित्री पुलाच्या दुर्घटनेची जबाबदारी सरकारचीच आहे. कमकुवत पुलाच्या दुरुस्तीबाबत त्याच वेळी कार्यवाही होणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली. भविष्यात अशा महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही शासनाकडून केली जात असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. पळस्पे ते इंदापूरपर्यंतच्या महामार्गाचे काम आघाडी सरकारच्या काळापासून रखडले होते. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे कोकणवासीयांचा आत्मा आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामात भूसंपादनाच्या अडचणी निर्माण होत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या ६०-६५ वर्षांत जितक्या किलोमीटरचे रस्ते बांधले गेले, त्यापेक्षाही अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते गेल्या तीन वर्षांच्या काळात नितीन गडकरी यांच्या विभागाने पूर्णत्वास नेले आहेत. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर विधानसभेत निवेदन करताना पावसाळ्यापूर्वी जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा त्या वेळी नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार मी केली होती. त्याच्या प्रत्यक्ष वचनपूर्तीचे समाधान झाल्याचे सांगत, या दुर्घटनेत बळी पडलेल्या प्रवाशांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांनाच दिले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले. पूर्वी कधीच दिला नव्हता इतका अधिक निधी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासासाठी दिला. त्याबद्दल गीते यांनी दोघांना धन्यवाद दिले. सावित्री पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याचा उल्लेखही गडकरी यांनी या वेळी केला.सावित्री पुलाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी दुर्घटनेनंतर मदतकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांसह शासकीय अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार भरत गोगावले, आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, प्रधान सचिव आशिष कुमार, जि. प. अध्यक्षा अदिती तटकरे, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, कोकण आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी मलिकनेर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.>लोकप्रतिनिधींनी सरकारला सहकार्य करावेकोकणातील सुमारे ६६० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ९९०० कोटी रुपयांच्या तीन पॅकेजेसना सरकारने मंजुरी दिली आहे. कोकणाचे भाग्य बदलण्याची ताकद या महामार्गामध्ये असल्याने कामातील अडथळे दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सरकारकडून येत्या तीन महिन्यांत महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.