शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पावसाचा दीड तास धुमाकूळ

By admin | Updated: June 15, 2017 00:25 IST

राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक/सोलापूर : राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आणि जनजीवन विस्कळीत झाले. सराफ बाजारात पाण्याचा लोट आल्याने वाहने वाहून गेली.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या लखलखाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. सराफ बाजार, कापडपेठेतील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. बुधवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांची धावपळ झाली. काहींना भाजीपाला तेथेच टाकून पळावे लागले. व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. जिल्हा न्यायालयात झाड पडून एक मुलगा जखमी झाला. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटने पथदीपांनी पेट घेतला होता. शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता, तो सुरळीत करण्याचे काम सुरू होते. अहमदनगर, सोलापूर, अमरावतीसह मराठवाड्यातही बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील २४ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. १७ व १८ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे़नगरला सहा वाड्यांचा संपर्क तुटला जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत येथील लेंडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सिमेंट बंधाऱ्यामुळे पुलावर तीन ते चार फूट पाणी वरून जात आहे. त्यामुळे बंधाऱ्याची एक फूट उंची कमी करण्यासाठी तोडफोड सुरू आहे. लेंडी नदीला पूर आल्ल्याने विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी घ्यावी लागली आहे.सोलापूरला जीप गेली वाहूनमुसळधार पावसाने ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बार्शी येथे जीप वाहून गेली. नागरिकांनी तातडीने उपाययोजना केल्याने तिघांचे प्राण वाचले. मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटे बार्शी तालुक्यात सरासरी ५४ मि.मी.पाऊस झाला. ढगफुटी झाल्याने नारी व परिसरातील शिवारात पाणीच पाणी झाल्याचे दिसत होते. लातूरला मांजरा नदीला पाणीलातूर शहर-परिसरात पाच दिवसांत १३१.४ मि.मी. पाऊस झाला असून मांजरा व तावरजा नदी वाहती झाली आहे. गतवर्षी या नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असून, शिऊर ते कव्ह्यापर्यंत नदीत पाणी स्थिरावले आहे. बीड जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर तालुक्यांत मंगळवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादमध्ये मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली. अमरावतीला वादळी पाऊसअमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.तीन दिवसांत विदर्भातनैऋत्य मोसमी पावसाने बुधवारी आंध्र प्रदेश किनारपट्टी, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, दक्षिण छत्तीसगडच्या काही भाग व ओडिशाच्या आणखी काही भागात प्रवेश केला़ ३ ते ४ दिवसांत गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा उर्वरित भाग, विदर्भात वाटचाल करण्यासाठी मान्सूनला अनुकूल परिस्थिती आहे़