शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नाशिकमध्ये पावसाचा दीड तास धुमाकूळ

By admin | Updated: June 15, 2017 00:25 IST

राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक/सोलापूर : राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आणि जनजीवन विस्कळीत झाले. सराफ बाजारात पाण्याचा लोट आल्याने वाहने वाहून गेली.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या लखलखाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. सराफ बाजार, कापडपेठेतील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. बुधवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांची धावपळ झाली. काहींना भाजीपाला तेथेच टाकून पळावे लागले. व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. जिल्हा न्यायालयात झाड पडून एक मुलगा जखमी झाला. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटने पथदीपांनी पेट घेतला होता. शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता, तो सुरळीत करण्याचे काम सुरू होते. अहमदनगर, सोलापूर, अमरावतीसह मराठवाड्यातही बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील २४ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. १७ व १८ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे़नगरला सहा वाड्यांचा संपर्क तुटला जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत येथील लेंडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सिमेंट बंधाऱ्यामुळे पुलावर तीन ते चार फूट पाणी वरून जात आहे. त्यामुळे बंधाऱ्याची एक फूट उंची कमी करण्यासाठी तोडफोड सुरू आहे. लेंडी नदीला पूर आल्ल्याने विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी घ्यावी लागली आहे.सोलापूरला जीप गेली वाहूनमुसळधार पावसाने ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बार्शी येथे जीप वाहून गेली. नागरिकांनी तातडीने उपाययोजना केल्याने तिघांचे प्राण वाचले. मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटे बार्शी तालुक्यात सरासरी ५४ मि.मी.पाऊस झाला. ढगफुटी झाल्याने नारी व परिसरातील शिवारात पाणीच पाणी झाल्याचे दिसत होते. लातूरला मांजरा नदीला पाणीलातूर शहर-परिसरात पाच दिवसांत १३१.४ मि.मी. पाऊस झाला असून मांजरा व तावरजा नदी वाहती झाली आहे. गतवर्षी या नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असून, शिऊर ते कव्ह्यापर्यंत नदीत पाणी स्थिरावले आहे. बीड जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर तालुक्यांत मंगळवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादमध्ये मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली. अमरावतीला वादळी पाऊसअमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.तीन दिवसांत विदर्भातनैऋत्य मोसमी पावसाने बुधवारी आंध्र प्रदेश किनारपट्टी, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, दक्षिण छत्तीसगडच्या काही भाग व ओडिशाच्या आणखी काही भागात प्रवेश केला़ ३ ते ४ दिवसांत गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा उर्वरित भाग, विदर्भात वाटचाल करण्यासाठी मान्सूनला अनुकूल परिस्थिती आहे़