शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नाशिकमध्ये पावसाचा दीड तास धुमाकूळ

By admin | Updated: June 15, 2017 00:25 IST

राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नाशिक/सोलापूर : राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आणि जनजीवन विस्कळीत झाले. सराफ बाजारात पाण्याचा लोट आल्याने वाहने वाहून गेली.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या लखलखाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. सराफ बाजार, कापडपेठेतील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. बुधवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांची धावपळ झाली. काहींना भाजीपाला तेथेच टाकून पळावे लागले. व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. जिल्हा न्यायालयात झाड पडून एक मुलगा जखमी झाला. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटने पथदीपांनी पेट घेतला होता. शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता, तो सुरळीत करण्याचे काम सुरू होते. अहमदनगर, सोलापूर, अमरावतीसह मराठवाड्यातही बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील २४ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. १७ व १८ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे़नगरला सहा वाड्यांचा संपर्क तुटला जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत येथील लेंडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सिमेंट बंधाऱ्यामुळे पुलावर तीन ते चार फूट पाणी वरून जात आहे. त्यामुळे बंधाऱ्याची एक फूट उंची कमी करण्यासाठी तोडफोड सुरू आहे. लेंडी नदीला पूर आल्ल्याने विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी घ्यावी लागली आहे.सोलापूरला जीप गेली वाहूनमुसळधार पावसाने ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बार्शी येथे जीप वाहून गेली. नागरिकांनी तातडीने उपाययोजना केल्याने तिघांचे प्राण वाचले. मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटे बार्शी तालुक्यात सरासरी ५४ मि.मी.पाऊस झाला. ढगफुटी झाल्याने नारी व परिसरातील शिवारात पाणीच पाणी झाल्याचे दिसत होते. लातूरला मांजरा नदीला पाणीलातूर शहर-परिसरात पाच दिवसांत १३१.४ मि.मी. पाऊस झाला असून मांजरा व तावरजा नदी वाहती झाली आहे. गतवर्षी या नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असून, शिऊर ते कव्ह्यापर्यंत नदीत पाणी स्थिरावले आहे. बीड जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर तालुक्यांत मंगळवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादमध्ये मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली. अमरावतीला वादळी पाऊसअमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.तीन दिवसांत विदर्भातनैऋत्य मोसमी पावसाने बुधवारी आंध्र प्रदेश किनारपट्टी, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, दक्षिण छत्तीसगडच्या काही भाग व ओडिशाच्या आणखी काही भागात प्रवेश केला़ ३ ते ४ दिवसांत गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा उर्वरित भाग, विदर्भात वाटचाल करण्यासाठी मान्सूनला अनुकूल परिस्थिती आहे़