शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

ओमी टीमही आमचीच, सत्ताही राष्ट्रवादीचीच

By admin | Updated: January 20, 2017 04:08 IST

महापालिका निवडणुकीत सर्वशक्तीनिशी उतरून राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता हस्तगत करेल.

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत सर्वशक्तीनिशी उतरून राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता हस्तगत करेल. ओमी कलानी टीम हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच भाग आहे आणि त्यांच्या कामामुळे उल्हासनगरात सत्ताही आमचीच येईल, असा दावा पक्षाचे प्रभारी, माजी मंत्री गणेश नाईक यांनी गुरूवारी केला.राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी शहर निरीक्षक सुधाकर वढे, आमदार ज्योती कालानी, प्रमोद हिंदूराव यांच्या उपस्थितीत खेमानी येथील कलानी महलमध्ये होतील, असा तपशील त्यांनी पुरवला. ओमी कलानी यांच्या टीमचे काम पाहून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रवेशाचा गळ टाकल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ओमी, त्यांची टीम व व्यापारी संघटना राष्ट्रवादीचेच अंग असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. दुसऱ्या पक्षातील चांगल्या नेत्यांना प्रवेश देवून भाजपा राजकारण ख्ोळत आहेत. त्याला ओमी टीम अपवाद असूु शकत नाही. उल्हासनगरात ओमी टीमची क्रेझ असून त्याद्बारे राष्ट्रवादीला सत्ता मिळेल, असा दावा नाईक यांनी केला. राष्ट्रवादीचे अर्धे-अधिक उमेदवार घोषित झाले असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. उरलेल्या इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी पार पडतील आणि यादी घोषित केली जाईल, असे ते म्हणाले. उल्हासनगर महापालिकेत गेली दहा वर्षे शिवसेना-भाजप, साई व रिपाइं महायुतीची सत्ता आहे. पण या काळात शहर १० वर्षे मागे गेले. शहराऐवजी या नेत्यांचाच विकास झाल्याचा टोमणा त्यांनी लगावला. एकही योजना पूर्ण करू न शकलेले महायुतीतील नेते कोणत्या तोंडाने मते मागणार, असा प्रश्न त्यांनी केला. (प्रतिनिधी) शनिवारपूर्वी ओमी भाजपात?ओमी टीमच्या धास्तीने शिवसेना-भाजप, रिपाइं व साई पक्षाची युती अंतीम टप्यात आहे. त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, असे संकेत भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी व शिवसेना प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले. भाजपचे वरिष्ठ नेते ओमी कालानी टीमच्या संपर्कात असून त्यांनीही युतीची चर्चा सुरू ठेवली आहे. राष्ट्र्वादीचे नेते ओमी टीमबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने त्यांना आश्वासन देण्यापूर्वी म्हणजेच शनिवारपूर्वी ओमी कलानी टीमला भाजप अटी-शर्ती बाजुला ठेवून प्रवेश देणार असल्याचे पक्षातील नेतेच खाजगीत सांगत आहेत. >दोन दिवस महत्त्वाचे उल्हासनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्तारूढ भाजपातील एका गटाने ओमी यांना प्रवेश द्या, अन्यथा फूट अटळ असल्याचा इशारा दिल्याने दोन दिवसांत पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे. केंद्रात, राज्यात, पालिकेत सत्तेत असलेल्या पक्षात फूट पडली तर निवडणुकीत त्याचा चुकीचा संदेश जाईल, यामुळे भाजपाला तोवर निर्णय घ्यावा लागेल. त्याचवेळी आधी उमेदवार निश्चित झाले असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी पुन्हा मुलाखती घेण्याचे ठरविल्याने तेही ओमी यांना आश्वासन देण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे जी काही राजकीय उलथापालथ घडणे अपेक्षित आहे, ती येत्या दोन दिवसांत होईल, असा अंदाज आहे.