शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ओमी टीमचा भाजपाला ऐनवेळी धोबीपछाड?

By admin | Updated: April 3, 2017 04:13 IST

महापौरपदाचे आश्वासन देऊन नंतर ते फिरवल्याने भाजपा आणि ओमी कलानी टीममध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने वेगळे वळण घेतले

उल्हासनगर : आधी महापौरपदाचे आश्वासन देऊन नंतर ते फिरवल्याने भाजपा आणि ओमी कलानी टीममध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने वेगळे वळण घेतले असून त्याचे पडसाद बुधवारच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. पंचम यांच्यासह ओमी टीमच्या नाराज २१ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा देण्याचे ठरवल्याने भाजपाची स्थिती कमकुवत बनली आहे. शिवसेनेने या असंतुष्टांभोवती गळ टाकल्याने हातातोंडाशी आणलेली सत्ता जाते की काय भीतीने भाजपा नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.ओमी यांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवून मीना आयलानी यांना महापौरपदाची संधी दिल्याने भाजपातील एक गट बिथरला आहे. त्यामुळे पंचम यांच्यासह ओमी गटाचे नगरसेवक महापौर निवडणुकीच्या तोंडावर सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबत ओमी कालानी व मनोज लासी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. भाजपाच्या ३३ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवक आमच्या गटाचे असल्याचा दावा ओमी सुरूवातीपासून करत आहेत. भाजपाने साई पक्षाला सोबत घेतले. पण त्या पक्षालाही फुटीचे ग्रहण लागले असून त्यांच्या ११ नगरसेवकांपैकी सहा जण फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा शिवसेना नेते करत आहेत. साई गटाची मान्यता रद्द झाल्याने त्यांना कोणताही व्हिप लागू होणार नाही. आधीच त्यांच्यातील फूट आणि ओमी गटाची ओढवून घेतलेली नाराजी यामुळे निष्ठावंत म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. (प्रतिनिधी)