शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नव्या टीएमटीला जुने टायर आणि बॅटऱ्या

By admin | Updated: January 7, 2017 03:51 IST

ठाणे महापालिका निवडणुकीत ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सेवा मिळावी

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सेवा मिळावी, या उद्देशाने सत्ताधारी आणि विरोधकांनी नवीन बसची चाचपणी न करताच केवळ आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या ठाणेकरांच्या सेवेत देऊन मतांचा जोगावा मिळवण्यासाठी जुन्या बॅटऱ्या आणि टायर असलेल्या बसेस घेतल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी याचे खापर परिवहन प्रशासनावर फोडले जात होते. परंतु, आता प्रशासनाने घूमजाव केल्याने सत्ताधारी आणि विरोधक अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही महिन्यांत ३५ बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, त्यांना बसवलेले टायर आणि बॅटऱ्या जुन्या असल्याची बाब परिवहन समितीच्या बैठकीत उघड झाली होती. याबाबत, परिवहन प्रशासनाने कबुली देऊन कंपनीकडून टायर व बॅटऱ्या बदलून घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकारामुळे टीएमटीचा संपूर्ण कारभार चौकशीच्या कचाट्यात सापडला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या मुद्यावरून चर्चेला सुरुवात होताच प्रशासनाकडून त्यासंबंधीचा खुलासा करण्यात आला. नवीन बसची खरेदी करण्यापूर्वी अभियांत्रिकी विभागाने त्यांची पाहणी व तपासणी केली होती. मात्र, बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वी त्यांची अंतिम तपासणी करणे गरजेचे असते. अभियांत्रिकी विभागाकडून मात्र तशी तपासणी झाली नव्हती, असे स्पष्टीकरण व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिले. तसेच यापुढे अभियांत्रिकी विभागाकडून तशा प्रकारची तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. कंपनीसोबत पत्रव्यवहार केला असून कंपनीने १२० टायर आणि १६ बॅटऱ्या बदलून देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी अनेक गाड्यांचे टायर आणि बॅटऱ्या बदलून देण्यात आल्या आहेत, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>बस आल्या गोदामातूननिवडणुकांपूर्वी या बसचे उद्घाटन उरकायचे असल्यामुळे कंपनीकडून घाईघाईने त्या मागवण्यात आल्या.कंपनीने त्यांच्या एका गोदामातून नवीन बसेस पाठवल्याने त्यामधील टायर आणि बॅटऱ्या जुन्या होत्या, अशी कबुलीही त्यांनी दिली.