शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

अरे रे, संधी हुकली!

By admin | Updated: July 10, 2014 23:28 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेहमीच वादाचा विषय ठरत असताना यंदा संमेलन स्थळ हाच मुख्य वादाचा विषय झाला आहे.

पुणो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेहमीच वादाचा विषय ठरत असताना यंदा संमेलन स्थळ हाच मुख्य वादाचा विषय झाला आहे. स्थळासाठी चर्चेत असणा:या बडोदा येथे संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी संयोजकांनी केली होती; परंतु संमेलन स्थळासाठी पंजाबवर शिक्कामोर्तब झाल्याने ही संधी हुकल्याची चर्चा साहित्यविश्वात रंगली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेरच आयोजित करण्याच्या उद्देशाने यंदाचे 88वे साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान गावी निश्चित झाले आहे; परंतु पंजाबला मराठी माणसे किती असणार, हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी भाषेच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात येणा:या साहित्य संमेलनाचा उद्देश कितपत साध्य होईल, याविषयी मोठे प्रश्नचिन्ह        आहे. 
याउलट चर्चेत असणा:या बडोद्याला मराठी भाषिकही जास्त असून, अनेक वर्षापासून ठराव करण्यात येणा:या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणीही या वेळी जोर धरणार होती, अशी माहिती बडोदा मराठी साहित्य परिषदेचे दिलीप खोपकर यांनी दिली. त्यामुळे आजवर राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेते मंडळी साहित्य संमेलनाला लाभले असले, तरी पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही प्रथमच वेळ असती. 
पंतप्रधान मोदी व लोकसभेच्या सभापती सुमित्र महाजन यांच्या उपस्थितीने संमेलनाला एक वेगळीच उंची प्राप्त होण्याची संधी होती. ही पाश्र्वभूमी ठाऊक असतानाही बडोद्याचा प्रस्ताव डावलून पंजाबची निवड म्हणजे ‘हातचे सोडून..’ असे असल्याची चर्चा रंगली आहे. 
बडोदा मराठी साहित्य परिषदेने मनाचा मोठेपणा दाखविला असला, तरी आता पंजाबमधील संमेलन आयोजकांवर त्याच्या तोडीस तोड आयोजनाची जबाबदारी आली आहे. (प्रतिनिधी)
 
4‘‘आम्ही गेली 4 वर्षे संमेलन बडोद्यात व्हावे म्हणून मागणी करत आहोत. या वेळी बडोदा येथे संमेलन होईल, अशी शक्यता अधिक वाटत होती. पंतप्रधान मोदी मराठी बोलतात, मराठी वाचनही करतात. त्यांचे मराठीवरील हे प्रेम ओळखून त्यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलावण्याची इच्छा होती. या निमित्ताने अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून ठेवण्यात येणारी मागणीही पंतप्रधानांपुढे मांडण्यात येणार होती, जेणोकरून त्याची व्याप्ती व वजनही वाढेल, असे वाटले होते; परंतु संमेलन येथे झाले नाही, तरी पुढच्या वर्षी पुन्हा निमंत्रण पाठविणार आहे,’’ असे दिलीप खोपकर म्हणाले. 
 
4बडोद्याचा प्रस्ताव डावलून पंजाबची निवड म्हणजे ‘हातचे सोडून..’ असे असल्याची चर्चा रंगली आहे.
4संमेलन मिळाले असते, 
तर पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता असती.