शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

‘दप्तराच्या ओझ्याला पर्याय जुनं ते सोनं’

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

कागल तालुक्यात उपक्रम राबविणार

कोल्हापूर : कागल पंचायत समितीतर्फे ‘दप्तराच्या ओझ्याला पर्याय जुनं ते सोनं’ हा उपक्रम जानेवारीपासून राबविला जात आहे. नावीन्यपूर्ण असा हा उपक्रम असून, प्रायोगिक तत्त्वावर बिद्री केंद्रातील सर्व शाळेत जानेवारीपासून सुरू आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यामुळे तालुक्यातील सर्व शाळांमध्ये कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती कागल गटविकास अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. शासनातर्फे दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे संच मोफत दिले जातात. परिणामी जुने संच विद्यार्थ्यांच्या घरी पडून राहतात. मात्र, या उपक्रमात २ मे रोजी जुने संच परत घेणे, जुने संच शाळेतच आपआपल्या जागेवर बेंचमध्ये ठेवणे, नवीन संच घरी अभ्यासाला ठेवणे, असे केल्यास पुस्तकांची ने-आण बंद होणार आहे. जुने संच कमी असतील, तर उपलब्ध संच दोन विद्यार्थ्यांमध्ये एक याप्रमाणे शाळेत बेंचमध्ये ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येकी दोन विषयांना एक १०० पेजीस वही, कच्ची नोंद ठेवण्याकरिता तीनच स्वाध्याय पुस्तिका शाळेत आणल्या जातील. प्रत्येक शिक्षकाकडे दोन विषय असतील, असे केल्याने मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होईल. रोज विद्यार्थी तीन वह्या, स्वाध्याय पुस्तिका, पेन, कंपास इतकेच साहित्य घेऊन येतील, असा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यातील शाळेत हा उपक्रम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)