मुंबई : कारवाईचा संपूर्ण दिवस पालिका अधिका:यांनी केवळ चर्चेतच वाया घालवला. यावेळी प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी अधिका:यांनी कोणत्याही प्रकारे पोलिसांची मदत घेतली नाही. तासागणिक रहिवाशांमधून चर्चेस येणारा प्रतिनिधी बदलत होता. त्यामुळे चर्चेत वेळ खर्ची घालणा:या अधिका:यांना कारवाई करताच आली नाही. एकंदरीतच पालिका प्रशासनाने आज रहिवाशांच्या विरोधासमोर साफ शरणागती पत्करल्याचे चित्र होते.
11.45ें - 12 ल्लल्ल
‘प्रकरण न्यायालयात सुरू असून पालिका अधिका:यांनी कारवाई स्थगित करावी’, असे म्हणत आमदार मंगलप्रभात लोढा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शायना एनसी यांनी अधिका:यांसोबत चर्चा केली.
12.15स्रे - 12.45स्रे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजय जामदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहूल नाव्रेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय मुदतवाढ मिळावी म्हणून पालिका अधिका:यांसोबत चर्चा केली.
1स्रे - 3स्रे
दुपारी एक वाजेर्पयत रहिवाशांनी प्रवेशद्वार उघडले नाही. परिणामी पालिका अधिका:यांनी वरळी पोलीस ठाणो गाठले. तिथे सुमारे दोन तासाहून अधिक काळ पालिका आणि पोलीस अधिका:यांनी पुढील कारवाईबाबत चर्चा केली.
4स्रे-4.15स्रे
दुपारी साडेतीन वाजता प्रवेशद्वाराबाहेर पोहचलेल्या अधिका:यांनी रहिवाशांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पंधरा मिनिटांत प्रत्येक इमारतीच्या अध्यक्ष किंवा सरचिटणीस यांनी कंपाऊंडबाहेर येण्याची विनंती अधिका:यांनी केली.
4.15स्रे-4.40स्रे
सात इमारतींमधील सोसायटींच्या पदाधिका:यांसोबत पालिका अधिका:यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यात आणखी एक ते दोन दिवसांची वाढीव मुदत सोसायटी पदाधिका:यांनी मागितली. मात्र ‘रहिवाशांना अवघ्या अध्र्या तासात प्रवेशद्वार खाली करण्यास सांगा, अन्यथा न्यायालयाचा अवमान आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल’, असा दम अधिका:यांनी भरला.
4.40स्रे-5.15स्रे
सुमारे अर्धा तास चर्चा केल्यानंतर रहिवाशांसोबत चर्चा केल्यानंतर सोसायटी पदाधिकारी परतले. रहिवाशी तयार होत नसल्याचे सांगत त्यांनी कारवाई करू नये, अशी मागणी केली.
5.30स्रे
रहिवाशांनी प्रवेशद्वाराचा ताबा सोडण्यास नकार दिल्याने शुक्रवारी कारवाई होणार नसल्याचे वागराळकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘शनिवारी होणा:या कारवाईबाबत आज सायंकाळीच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मात्र न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येईल.’ मात्र शनिवारी बळाचा वापर करणार की नाही, याबाबत त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.