शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना खडसावले

By admin | Updated: June 11, 2015 01:17 IST

राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत

मुंबई : राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य बँक, जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांना खडसावले. शेतकऱ्यांच्या कर्जाची फेररचना करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्जाची फेररचना करताना शेतकऱ्यांचे कर्ज कायम राहते आणि जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुधारते, हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच ही फेररचना पुन्हा एकदा बँकांच्या पथ्यावर पडता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. नियमांवर बोट ठेवायचे आणि वर्षानुवर्षे चाललेले पठडीतील धोरण राबवून ‘लकीर के फकीर’ बनून काम करायचे ही प्रवृत्ती सोडायला हवी. शेतकऱ्यांवरील कर्जाची फेररचना करताना जिल्हा बँका नव्या कर्जातून आधीचे कर्ज कापून घेतात. त्यामुळे बँकांना पैसा मिळतो, पण शेतकरी पुन्हा कर्जबाजारीच राहतो. या पद्धतीच्या पलीकडे जाऊन शेतकरी कर्जबाजारी राहणार नाही, असा ठोस प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. (विशेष प्रतिनिधी)