शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना ‘स्वच्छ भारत’ अभियानाची धास्ती

By admin | Updated: February 1, 2017 02:44 IST

सध्या राज्यात १० महापालिकांसह 2५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात काही चूक झाल्यास एकीकडे निवडणूक आयोगाच्या

- नारायण जाधव, ठाणेसध्या राज्यात १० महापालिकांसह 2५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात काही चूक झाल्यास एकीकडे निवडणूक आयोगाच्या बडग्याची भीती असताना आता दुसरीकडे ३१ मार्च २०१७पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले गाव, शहर, महानगर हागणदारीमुक्त न झाल्यास त्याची नोंद राज्यातील महापालिकांच्या आयुक्तांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सेवा गोपनीय अहवालात घेतली जाईल, प्रतिकूल शेरे लिहिले जातील, असे बजावण्यात आले आहे. स्था. स्व. संस्थांच्या प्रमुखांच्या सीआर अर्थात गोपनीय अहवालात मोदींच्या स्वच्छ भारत अभियानातील हगणदारीमुक्तीची नोंद घेतली जाणार आहे. यात हगणदारीमुक्तीत कामचुकार करणाऱ्या आयुक्त, जि.प. आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या २०१६-१७ सेवा गोपनीय अहवालात संबंधित अधिकाऱ्याने त्याला दिलेले शौचालयांसह हगणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केले असेल तर अनुकूल आणि केले नसेल तर प्रतिकूल शेरे लिहावेत. तसे सामान्य प्रशासन विभागालादेखील कळवावे, असे सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रमुख निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यातच याच काळात केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती त्या त्या शहरांना भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करीत आहे. यामुळे एकीकडे निवडणुकीचे काम चोख ठेवायचे, दुसरीकडे येणाऱ्या समितीची बडदास्त ठेवायची तसेच शहर हागणदारीमुक्तदेखील करायचे असा सामना आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांना करावा लागत आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्याचा ग्राम विकाससह पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग १२ ते १५ हजार रुपयांचे अनुदान देत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांकडे शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अनेक अडचणी येत आहेत. ठाण्यात ग्रामीण भागाने शौचालय बांधणीत विक्रम केला असून, याबाबत ठाणे जि.प.चे मुख्याधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. मात्र, शहरी भागात जागेअभावी अनेक अडचणी येत आहेत. (प्रतिनिधी)नवी मुंबई पालिकेचा उताराठाण्यात ग्रामीण भागाने शौचालय बांधणीत विक्रम केला असून, याबाबत ठाणे जि.प.चे मुख्याधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. नवी मुंबई महापालिकेने कंटेनरमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्याचा उतारा शोधला आहे.