शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना ‘स्वच्छ भारत’ अभियानाची धास्ती

By admin | Updated: February 1, 2017 02:44 IST

सध्या राज्यात १० महापालिकांसह 2५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात काही चूक झाल्यास एकीकडे निवडणूक आयोगाच्या

- नारायण जाधव, ठाणेसध्या राज्यात १० महापालिकांसह 2५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात काही चूक झाल्यास एकीकडे निवडणूक आयोगाच्या बडग्याची भीती असताना आता दुसरीकडे ३१ मार्च २०१७पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले गाव, शहर, महानगर हागणदारीमुक्त न झाल्यास त्याची नोंद राज्यातील महापालिकांच्या आयुक्तांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सेवा गोपनीय अहवालात घेतली जाईल, प्रतिकूल शेरे लिहिले जातील, असे बजावण्यात आले आहे. स्था. स्व. संस्थांच्या प्रमुखांच्या सीआर अर्थात गोपनीय अहवालात मोदींच्या स्वच्छ भारत अभियानातील हगणदारीमुक्तीची नोंद घेतली जाणार आहे. यात हगणदारीमुक्तीत कामचुकार करणाऱ्या आयुक्त, जि.प. आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या २०१६-१७ सेवा गोपनीय अहवालात संबंधित अधिकाऱ्याने त्याला दिलेले शौचालयांसह हगणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केले असेल तर अनुकूल आणि केले नसेल तर प्रतिकूल शेरे लिहावेत. तसे सामान्य प्रशासन विभागालादेखील कळवावे, असे सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रमुख निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यातच याच काळात केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती त्या त्या शहरांना भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करीत आहे. यामुळे एकीकडे निवडणुकीचे काम चोख ठेवायचे, दुसरीकडे येणाऱ्या समितीची बडदास्त ठेवायची तसेच शहर हागणदारीमुक्तदेखील करायचे असा सामना आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांना करावा लागत आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्याचा ग्राम विकाससह पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग १२ ते १५ हजार रुपयांचे अनुदान देत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांकडे शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे अनेक अडचणी येत आहेत. ठाण्यात ग्रामीण भागाने शौचालय बांधणीत विक्रम केला असून, याबाबत ठाणे जि.प.चे मुख्याधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. मात्र, शहरी भागात जागेअभावी अनेक अडचणी येत आहेत. (प्रतिनिधी)नवी मुंबई पालिकेचा उताराठाण्यात ग्रामीण भागाने शौचालय बांधणीत विक्रम केला असून, याबाबत ठाणे जि.प.चे मुख्याधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. नवी मुंबई महापालिकेने कंटेनरमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्याचा उतारा शोधला आहे.