शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी फसविले मुख्यमंत्र्यांना !

By admin | Updated: September 5, 2015 01:35 IST

दुष्काळ पाहणीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील सातवडला पोचला....गावात एकही टँकर नाही, हे ऐकताच मुख्यमंत्री भारावून गेले. कारण काय तर गावातील आदर्श जलमीटर योजना

अण्णासाहेब नवथर, अहमदनगरदुष्काळ पाहणीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील सातवडला पोचला....गावात एकही टँकर नाही, हे ऐकताच मुख्यमंत्री भारावून गेले. कारण काय तर गावातील आदर्श जलमीटर योजना! मुख्यमंत्र्यांचे भारावलेपण अधिकच वाढले. त्यांनी तत्काळ घोषणा केली की ‘या योजनेचा आदर्श राज्यातील गावांनी घ्यावा!’ हीच आदर्श योजना मुख्यमंत्री गेल्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत ‘उघडी’ पडली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चक्क कोरड्या उद्भवावरील बंद पडलेली, गंजलेली योजना आदर्श म्हणून दाखवत चक्क मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केल्याचे समोर आले.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील दुसरा टप्पा पाथर्डी तालुक्यात होता. मुख्यमंत्री सातवड गावाच्या शिवारात शिरल्यापासून, या गावाने दुष्काळावर कशी मात केली याची घोकंपट्टी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सुरु झाली होती. गावकुसावर असलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून ताफा गावात शिरला़ शिवराम वाघ यांच्या पॉलिहाऊसची पाहणी झाली़ त्यानंतर हा ताफा गावातील जलमीटरची पाहणी करण्यासाठी निघाला़ अनिता वाघ यांच्या घरासमोरील नळाला बसविलेले मीटर पाहताच मुख्यमंत्री खूश झाले. तेवढ्यात गर्दीतून कोणीतरी ओरडले, ‘सांगा काय फायदा झाला?’ त्यावर ‘जलमीटरमुळे पाणीपट्टी ४० वरून ३० रुपये झाली़ पाण्याचीही मोठी बचत झाली़ पूर्वी ४०० लीटर पाणी घेत होतो़ मीटर बसविल्यापासून ३५० लीटरच पाणी घेतो़ मीटरचा चांगला फायदा झाला.’ असे भडाभडा त्या महिलेने सांगून टाकले. यामुळे मुख्यमंत्री अधिकच भारावले. त्यांनी तातडीने ‘सातवड गावाचा आदर्श राज्याने घ्यावा’, अशी घोषणाच करून टाकली. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे वेगळीच कुजबुज सुरू होती. गावाला वर्षापासून पाणी नाही याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू झाली. पण ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलीच नाही. बंद पडलेल्या योजनेवर मीटर बसवून आदर्श योजनेचा खटाटोप गावकऱ्यांच्या बोलण्यातून समोर आला. ‘लोकमत’ने त्यानंतर रीतसर ही योजनाच तपासली. तेव्हा हा बनाव पूर्णपणे समोर आला. गावपुढाऱ्यांच्या मदतीने अधिकाऱ्यांनी चक्क राज्याच्याच मुख्यमंत्र्यांना फसविण्याचा प्रकार घडला. मुळात ज्या विहिरीवर ही योजना आहे, ती विहीर वर्षभरापासून बंद आहे. उपसा करणारी योजनाही गंज लागून बंद पडली आहे. ही योजना दशकभर जुनी आहे. सध्या गाव तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. त्यासाठी प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव पाठविले आहेत, पण ते मंजूरच केले जात नाहीत, अशी तक्रारवजा माहिती प्रशासनातीलच एकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.