शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

पाण्याच्या समस्येला अधिकारीच जबाबदार

By admin | Updated: April 8, 2017 04:39 IST

अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या

अंबरनाथ : अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या होत्या. अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती घेतली जात असतानाच अंबरनाथमधील काँग्रेस नगरसेवकांनी थेट कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आल्याचे कळताच पाणीसमस्येने त्रस्त असलेल्या इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीसमस्येसोबतच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी येथील पाणीप्रकल्पाची माहिती घेण्यासाठी अधीक्षक अभियंता मनीषा पालांडे या अंबरनाथमध्ये आल्या होत्या. कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात यासंदर्भात बैठक सुरू होती. याच वेळी पाणीसमस्येची आणि दोन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या योजनेची तक्रार करण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील, उमेश पाटील, चरण रसाळ, विलास जोशी हे प्राधिकरणाच्या कार्यालयात आले होते. या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने या सर्व नगरसेवकांनी पालांडे यांची भेट घेत त्यांच्यापुढे तक्रार केली. वरिष्ठ अधिकारी आल्याचे कळताच पाणीपुरवठा सभापती रेश्मा गुडेकर आणि भाजपाचे नगरसेवक वसंत पाटील हेही अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. या वेळी सर्व नगरसेवकांनी चिंचपाडा येथील पाण्याच्या टाकीची आणि नवीन भेंडीपाडा येथून येणाऱ्या जलवाहिनीच्या रखडलेल्या कामाची तक्रार पालांडे यांच्याकडे केली. दोन वर्षे हे काम रखडल्यानेच पश्चिम भागाला पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी अन्य अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)>पाणी विकतातप्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी हे काही बिल्डरांना पाणी विकत असल्याचा आरोप या वेळी केला. तसेच पाणीचोरीचे प्रकार उघड केल्यावरही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. रात्री १२ नंतर बिल्डरांना पाणी पुरवण्याचे काम अधिकारी करत असल्याचे पाटील यांनी पालांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात पालांडे यांनी लागलीच चौकशी करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. शहरातील पाण्याचे पुन्हा नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जलवाहिनी टाकण्याचे थांबलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी योग्य ते आदेश येत्या काही दिवसांत निश्चित दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.