शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

ऑक्टोबर घाम काढणार!

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला असतानाच मुंबईतील बहुतेक विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढती रंगणार आहेत.

सचिन लुंगसे - मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला असतानाच मुंबईतील बहुतेक विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढती रंगणार आहेत. मात्र या पंचरंगी लढतींमुळे महायुती आणि आघाडीचे कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांमध्ये विभागले आहेत. कार्यकत्र्याचीही वानवा आहे. आणि त्यातच ऑक्टोबर हीटने गदारोळ माजविल्याने संपूर्ण महिन्यातील कमाल तापमानाचा पारा 34 ते 36 अंशादरम्यान राहणार असल्याने राजकीय रणधुमाळीत मुंबईकरांचा चांगलाच घाम निघणार आहे.
पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याचा हा कालखंड असल्याने या काळात ऋतुचक्रात बदल होत असतात. त्यामुळे या काळात सातत्याने वाहणा:या वा:याची दिशा बदलत असते. मुळात समुद्राहून मुंबईकडे जे दमट वारे वाहतात, त्या वा:यामुळे शहराचे तापमान नियंत्रण राहण्यास मदत होत असते. परंतु वा:याच्या दिशा सातत्याने बदलत राहत असल्याने सद्य:स्थितीमध्ये आग्नेय दिशेकडून वाहणा:या वा:याचा प्रभाव अधिक आहे. परिणामी तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, मान्सून वा:यामुळे हवेतील बाष्प कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या कारणास्तव पुढील आणखी काही दिवस मुंबईकरांचा घाम निघणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, मुळातच परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्यातच महाराष्ट्रातून काढता पाय घेतो. मात्र या वेळी परतीच्या पावसाचा प्रवास राजस्थानातूनच विलंबाने सुरू झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये परतीच्या पावसाने राजस्थानसह गुजरात राज्याचा काही भाग आणि उत्तरेकडील आणखी काही राज्ये काबीज केली आहेत. परतीच्या पावसाचा प्रवास ईशान्यकडील राज्याकडून नंतर महाराष्ट्राच्या दिशेने झाला आहे. आता तो महाराष्ट्रातूनही पुढे सरकेल. परंतु या प्रक्रियेला किमान ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडेल. सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात मान्सूनचा जोर राहणो अपेक्षित होते. परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांत उन्हाने डोके वर काढले आणि आता तर कमाल तापमानाचा पारा थेट 37 अंशावर जाऊन ठेपला. मागील चारएक दिवसांपासून शहराचे कमाल तापमान 28 अंशाहून थेट 32 अंशावर पोहोचले आहे. आणि आता तर कमाल तापमानाचा पारा थेट 34 व 37 अंशावर पोहोचला असून, ऑक्टोबर महिन्यात सरासरी तापमान 34 अंशाच्या आसपास राहणार आहे. (प्रतिनिधी)