शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अरेरे किती हे दुर्दैव - परळच्या ऑफिसमधला शेवटचा दिवस ठरला शेवटचाच!

By darshana.tamboli | Updated: September 29, 2017 17:15 IST

जर नशीबात मृत्यू लिहिलेलाच असेल तर काळही येतो आणि वेळही याचा दुर्दैवी अनुभव आज मुंबईतल्या ट्रीसा पॉल कुटुंबियांना आला.

ठळक मुद्दे जर नशीबात मृत्यू लिहिलेलाच असेल तर काळही येतो आणि वेळही याचा दुर्दैवी अनुभव आज मुंबईतल्या ट्रीसा पॉल कुटुंबियांना आला. फिनिक्स मिलमधल्या मॉलमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी एलफिन्स्टन स्टेशनवरून जाण्याचा ट्रीसा यांचा आजचा शेवटचा दिवस होता.

मुंबई - जर नशीबात मृत्यू लिहिलेलाच असेल तर काळही येतो आणि वेळही याचा दुर्दैवी अनुभव आज मुंबईतल्या ट्रीसा पॉल कुटुंबियांना आला. फिनिक्स मिलमधल्या मॉलमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी एलफिन्स्टन स्टेशनवरून जाण्याचा ट्रीसा यांचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यांचं ऑफिस अंधेरीतील साकी नाका येथे शिफ्ट होत असल्याने पुढच्या आठवड्यापासून त्या अंधेरीला जाणार होत्या. आजचा एलफिन्स्टन स्थानकातून शेवटचा प्रवास करण्यासाठी त्या आल्या आणि दुर्दैवानं चेंगराचेंगरीच्या रुपानं काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि ट्रीसा यांचा आयुष्याचाच हा शेवटचा दिवस ठरला. त्यातही खेदाची बाब म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी बाळाला जन्म दिला होता आणि 10 दिवसांपूर्वीच त्यांनी ऑफिसला येणं सुरू केलं होतं. पण शुक्रवारची सकाळ ट्रीसा यांच्यासाठी अखेरची सकाळ ठरली. घरून ऑफिसला जात असताना एलफिन्स्टन परळ स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ट्रीसा पॉल यांचा मृत्यू झाला. 

एलफिन्स्टन परळ स्टेशनवरील पुलावर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीने 20 पेक्षा जास्त बळी घेतले. या घटनेनं राज्यातच नाही, देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. मुंबईत रोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनने प्रवास करणारी आपली व्यक्ती घरी येईलच की नाही ? याची शाश्वती कधी कुणीही देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. मुंबईत आज घडलेल्या दुर्घटनेत कुणी आपली आई, कुणी बहीण, कुणी भाऊ तर कुणी वडील गमावले आहेत. ह्रदयाचा ठोका चुकविणाऱ्या या घटनेमध्ये नुकतीच बाळंतिण झालेल्या एका आईने आपला जीव गमावला आहे. ट्रीसा पॉल या त्या कंपनीत  सेक्रेटरी पदावर कार्यरत होत्या. 

लोअर परळमधील फिनिक्स मॉलमध्ये ऑफिस असलेली ही कंपनी साकीनाक्यामधील नव्या ऑफिसमध्ये मंगळवारी म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून शिफ्ट होत आहे. सध्याच्या लोअर परळमधील ऑफिसमध्ये आज प्रत्येकाचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून दोन तारखेपर्यंत सुट्टी असल्याने तीन ऑक्टोबरपासून सगळेच नवीन ऑफिसमध्ये जाणार आहेत. ट्रीसा यांचाही लोअर परळमधील ऑफिसमध्ये आज शेवटचा दिवस होता. उद्यापासून त्यांनाही एलफिन्स्टन परळ स्टेशनच्या पुलाचा वापर करावा लागणार नव्हता. पण त्याआधीच ट्रीसा रॉय यांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. ट्रीसा यांच्यासारखे इतरही लोक या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. रेल्वे प्रशासन आता तरी जागं होईल का आणि प्रवाशांना चांगल्या पायाभूत सुविधा देईल का? हा प्रश्न आहे. 

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेcentral railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे