शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

वाहनांची संख्या झाली कमी

By admin | Updated: November 20, 2015 01:29 IST

दरवर्षी वाहनसंख्येत ५ टक्के वाढ होत असल्याचे गृहीत धरले असतानाही, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या

पुणे : दरवर्षी वाहनसंख्येत ५ टक्के वाढ होत असल्याचे गृहीत धरले असतानाही, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा घट झाली आहे! रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्वतंत्र एजन्सीमार्फत जे सर्वेक्षण केले, त्या आकडेवारीपेक्षाही निम्मीच वाहने रस्त्यारून धावत असल्याचे टोल आकारणी करणाऱ्या कंपनीच्या आकडेवारीवरून ही घट प्रकर्षाने जाणवते.एमएसआरडीसीने एजेएस स्केल इंटरनॅशनल या एजन्सीकडून जानेवारी आणि फेबु्रवारी २०१४ मध्ये सातारा-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे या टोल नाक्यांवरून दररोज किती वाहने धावतात, याचा सर्वे करून घेतला होता़ त्यानुसार किणी टोल नाक्यावरून जानेवारी २०१४ मध्ये १९ हजार २७ तर, तासवडे टोलनाक्यावरून २२ हजार ३८ वाहने दररोज धावत असल्याचे दिसले. मात्र, टोलवसुली करणाऱ्या कन्सल्टिंग इंजिनियर्स ग्रुपने दिलेल्या आकडेवारीत, जानेवारीत किणी टोल नाक्यावरून १३ हजार ७९० वाहने, तर तासवडे टोल नाक्यावरून १४ हजार ८६६ वाहने धावल्याची नोंद आहे!टोलवसुलीचा करार करताना दरवर्षी ५ टक्के वाहनसंख्या वाढणार, असे गृहीत धरले आहे. मात्र, २०१४ मध्ये जितकी वाहने या रस्त्यावरून गेली, त्यात २०१५ मध्ये घट झाल्याचेही दाखविण्यात आले आहे. वाहने घटली कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)१२ वर्षांत वाहनसंख्येत वाढच नाहीरस्ते विकास महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार, आॅक्टोबर २००३ मध्ये किणी टोल नाक्यावरून १० हजार ८६४ आणि तासवडे टोल नाक्यावरून ९ हजार ८८६ वाहने जात होती. मात्र, बारा वर्षांनंतरही, तसेच प्रमाण आज कंपनी दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले, ‘एखाद्या महामार्गावरील वाहने १० वर्षांत कमी झाल्याचे जगात उदाहरण नाही़ टोल कंपन्यांनी दिलेली आकडेवारी आणि आपण करवून घेतलेल्या सर्वेची आकडेवारी तपासून पाहण्याची कोणतीही तसदी रस्ते विकास महामंडळ अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेत नाही.