शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
2
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
3
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
4
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
7
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
8
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
9
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
10
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
11
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
12
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
13
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
14
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
15
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
16
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
17
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
18
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
19
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

वाहनांची संख्या झाली कमी

By admin | Updated: November 20, 2015 01:29 IST

दरवर्षी वाहनसंख्येत ५ टक्के वाढ होत असल्याचे गृहीत धरले असतानाही, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या

पुणे : दरवर्षी वाहनसंख्येत ५ टक्के वाढ होत असल्याचे गृहीत धरले असतानाही, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा घट झाली आहे! रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्वतंत्र एजन्सीमार्फत जे सर्वेक्षण केले, त्या आकडेवारीपेक्षाही निम्मीच वाहने रस्त्यारून धावत असल्याचे टोल आकारणी करणाऱ्या कंपनीच्या आकडेवारीवरून ही घट प्रकर्षाने जाणवते.एमएसआरडीसीने एजेएस स्केल इंटरनॅशनल या एजन्सीकडून जानेवारी आणि फेबु्रवारी २०१४ मध्ये सातारा-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे या टोल नाक्यांवरून दररोज किती वाहने धावतात, याचा सर्वे करून घेतला होता़ त्यानुसार किणी टोल नाक्यावरून जानेवारी २०१४ मध्ये १९ हजार २७ तर, तासवडे टोलनाक्यावरून २२ हजार ३८ वाहने दररोज धावत असल्याचे दिसले. मात्र, टोलवसुली करणाऱ्या कन्सल्टिंग इंजिनियर्स ग्रुपने दिलेल्या आकडेवारीत, जानेवारीत किणी टोल नाक्यावरून १३ हजार ७९० वाहने, तर तासवडे टोल नाक्यावरून १४ हजार ८६६ वाहने धावल्याची नोंद आहे!टोलवसुलीचा करार करताना दरवर्षी ५ टक्के वाहनसंख्या वाढणार, असे गृहीत धरले आहे. मात्र, २०१४ मध्ये जितकी वाहने या रस्त्यावरून गेली, त्यात २०१५ मध्ये घट झाल्याचेही दाखविण्यात आले आहे. वाहने घटली कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)१२ वर्षांत वाहनसंख्येत वाढच नाहीरस्ते विकास महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार, आॅक्टोबर २००३ मध्ये किणी टोल नाक्यावरून १० हजार ८६४ आणि तासवडे टोल नाक्यावरून ९ हजार ८८६ वाहने जात होती. मात्र, बारा वर्षांनंतरही, तसेच प्रमाण आज कंपनी दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले, ‘एखाद्या महामार्गावरील वाहने १० वर्षांत कमी झाल्याचे जगात उदाहरण नाही़ टोल कंपन्यांनी दिलेली आकडेवारी आणि आपण करवून घेतलेल्या सर्वेची आकडेवारी तपासून पाहण्याची कोणतीही तसदी रस्ते विकास महामंडळ अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेत नाही.