शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

बोर अभयारण्यातील वाघांची संख्या घटली

By admin | Updated: October 24, 2014 03:52 IST

वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच वाघांसाठी राखीव, म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याला अलीकडेच वाघांसाठी राखीव, म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी या अभयारण्यातील वाघांची संख्या सात वर्षांपासून सतत खालावत असल्याचे भीषण वास्तव उजेडात आले आहे़ सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारांतर्गत याबाबतची माहिती मागवली होती़ त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या माहितीतून हा खुलासा झाला आहे. वन विभागाच्या माहितीनुसार गत २००७ मध्ये बोर व न्यू बोर अभयारण्यात एकूण सहा वाघांचा अधिवास होता. यानंतर २००८ ते २०११ दरम्यान येथील वाघांची प्रगणना होऊ शकली नाही. त्यामुळे या काळातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. परंतु २०१२ मध्ये झालेल्या प्रगणेत येथील वाघांची संख्या सहावरून पाच झाली आहे. शिवाय २०१४ मध्ये ती पुन्हा खाली घसरून, आता केवळ चार वाघ येथे शिल्लक राहिले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचवेळी वन्यजीव विभाग मात्र मागील दोन वर्षांत बोर व न्यू बोर अभयारण्यात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा ढिंडोरा पिटून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. जर या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासंबंधी एवढी विकास कामे झाली, तर वाघांची संख्या कमी का होत आहे? असा वन्यजीवप्रेमी संघटनांतर्फे सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे नागपूरशेजारच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघाच्या संख्येत वाढ होऊन, सध्या येथे एकूण चार वाघांचा अधिवास असल्याचे वन्यजीव विभाग सांगत आहे.गत २००७ च्या प्रगणनेनुसार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात एकही वाघ नव्हता. परंतु २०१३ मध्ये येथील वाघांची संख्या तीनवर पोहोचली आणि २०१४ मध्ये त्यात पुन्हा एका वाघाची भर पडून ती चार झाली आहे. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण २३ वाघ असल्याचा दावा करण्यात आला आहे.यात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल आठ वाघांची भर पडली आहे. २०१३ मध्ये येथे एकूण १५ वाघ होते. परंतु आता ती संख्या २३ वर पोहोचली असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)