शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची संख्या ६ हजारवरून १२०० वर

By admin | Updated: June 19, 2017 02:47 IST

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली, त्या-त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे टँकरमुक्ती झाल्याचे दिसले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ज्या-ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे झाली, त्या-त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे टँकरमुक्ती झाल्याचे दिसले. गेल्या वर्षी मे महिन्यात जवळपास ६ हजार २०० टँकरसुरू होते. यंदा त्यांची संख्या बाराशेपर्यंत खाली आली. राज्यात आतापर्यंत १ हजार १९० गावे टँकरमुक्त झाली असून, साधारण ५ हजार गावे टँकरमुक्तीच्या मार्गावर आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या काय्रक्रमांतर्गत ‘पाणी’ या विषयावरील कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री बोलत होते. लातुरला मागच्या वेळी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता, पण नंतर तिथे लोकसहभागातून जलयुक्त शिवारची चांगली कामे झाली आणि अनेक गावे टँकरमुक्त होऊ शकली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून योजना तयार करण्यात आली असून साधारण ४१ हजार स्रोतांच्या बळकटीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागांत समन्वय निर्माण करून, राज्य कायमचे टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात सर्वच प्रकल्पांना थोडा-थोडा निधी देऊन सगळेच प्रकल्प अर्धवट ठेवण्यात आले होते. आता त्यातील जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांना प्राधान्याने निधी देऊन ते पूर्ण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. २०१९पर्यंत प्रकल्प मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाला जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, ९०० कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.