शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

राज्यात अभयारण्यांची संख्या वाढली

By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST

देशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे.

- गणेश वासनिक,  अमरावतीदेशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे. एकूण ३३ टक्के जंगलक्षेत्रापैकी एकट्या विदर्भात २० टक्के जंगल असल्याने विदर्भावर विशेषत: भर दिला जात आहे. राज्यात आधी तीनच व्याघ्र प्रकल्प होते. परंतु आता सहा व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, वाघ, बिबट, हरीण, रानगवा, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यपशूंचे संरक्षण, संगोपन करणे सोयीचे झाले आहे. राज्यातील ४७ अभयारण्यांपैकी विदर्भात २४ अभयारण्ये असल्याने जंगलाची घनता, वन्यपशूंची संख्या निश्चितपणे वाढली आहे. एकीकडे जंगलाचा ऱ्हास होत असल्याच्या घटना पुढे येत असताना विदर्भात सर्वाधिक जंगल, वन्यपशू असल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. मराठवाड्यात जंगलांची टक्केवारी नगण्यराज्यात ४७ अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली असली, तरी मराठवाड्यात जंगल हे २ ते ३ टक्के आहे. औरंगाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जंगलाची टक्केवारी फारच कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. कोकण, ठाणे, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव या भागांत जंगलक्षेत्र काहीअंशी आहे.राज्यात सहा व्याघ्र प्रक ल्पांचे संरक्षित व अतिसंरक्षित असे क्षेत्रफळ ७ हजार १९४ चौरस कि.मी. असून, पाच व्याघ्र प्रकल्प हे विदर्भात तर एक सह्याद्री व्याघ्रप्रकल्प हा सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. तसेच कोल्हा मार्ग, मुक्ता भवानी, ममनापूर व मोरगड हे जंगल संवर्धन क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.अभयारण्याची संख्या वाढल्याने वन्यपशूंच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भात जंगल अधिक प्रमाणात असल्याने वन्यपशूंच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर आली आहे.- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्पसहा व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्रफळ असे...मेऴघाट- २७६७.५२ चौरस कि.मी.ताडोबा- १७२७ चौरस कि.मी. पेंच- ७४१ चौरस कि.मी.सह्याद्री- ११६५ चौरस कि.मी.नवेगाव बांध-नागझिरा- १९०१ चौरस कि.मी.बोर- ७९९ चौरस कि.मी.