शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

राज्यात अभयारण्यांची संख्या वाढली

By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST

देशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे.

- गणेश वासनिक,  अमरावतीदेशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे. एकूण ३३ टक्के जंगलक्षेत्रापैकी एकट्या विदर्भात २० टक्के जंगल असल्याने विदर्भावर विशेषत: भर दिला जात आहे. राज्यात आधी तीनच व्याघ्र प्रकल्प होते. परंतु आता सहा व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, वाघ, बिबट, हरीण, रानगवा, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यपशूंचे संरक्षण, संगोपन करणे सोयीचे झाले आहे. राज्यातील ४७ अभयारण्यांपैकी विदर्भात २४ अभयारण्ये असल्याने जंगलाची घनता, वन्यपशूंची संख्या निश्चितपणे वाढली आहे. एकीकडे जंगलाचा ऱ्हास होत असल्याच्या घटना पुढे येत असताना विदर्भात सर्वाधिक जंगल, वन्यपशू असल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. मराठवाड्यात जंगलांची टक्केवारी नगण्यराज्यात ४७ अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली असली, तरी मराठवाड्यात जंगल हे २ ते ३ टक्के आहे. औरंगाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जंगलाची टक्केवारी फारच कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. कोकण, ठाणे, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव या भागांत जंगलक्षेत्र काहीअंशी आहे.राज्यात सहा व्याघ्र प्रक ल्पांचे संरक्षित व अतिसंरक्षित असे क्षेत्रफळ ७ हजार १९४ चौरस कि.मी. असून, पाच व्याघ्र प्रकल्प हे विदर्भात तर एक सह्याद्री व्याघ्रप्रकल्प हा सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. तसेच कोल्हा मार्ग, मुक्ता भवानी, ममनापूर व मोरगड हे जंगल संवर्धन क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.अभयारण्याची संख्या वाढल्याने वन्यपशूंच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भात जंगल अधिक प्रमाणात असल्याने वन्यपशूंच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर आली आहे.- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्पसहा व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्रफळ असे...मेऴघाट- २७६७.५२ चौरस कि.मी.ताडोबा- १७२७ चौरस कि.मी. पेंच- ७४१ चौरस कि.मी.सह्याद्री- ११६५ चौरस कि.मी.नवेगाव बांध-नागझिरा- १९०१ चौरस कि.मी.बोर- ७९९ चौरस कि.मी.