शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अभयारण्यांची संख्या वाढली

By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST

देशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे.

- गणेश वासनिक,  अमरावतीदेशात सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. ही संख्या २८वरून ४७वर पोहोचली आहे. अभयारण्यांच्या निर्मितीमुळे वन्यपशू, जंगलाचे संरक्षण करणे सुकर झाले आहे. एकूण ३३ टक्के जंगलक्षेत्रापैकी एकट्या विदर्भात २० टक्के जंगल असल्याने विदर्भावर विशेषत: भर दिला जात आहे. राज्यात आधी तीनच व्याघ्र प्रकल्प होते. परंतु आता सहा व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, वाघ, बिबट, हरीण, रानगवा, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यपशूंचे संरक्षण, संगोपन करणे सोयीचे झाले आहे. राज्यातील ४७ अभयारण्यांपैकी विदर्भात २४ अभयारण्ये असल्याने जंगलाची घनता, वन्यपशूंची संख्या निश्चितपणे वाढली आहे. एकीकडे जंगलाचा ऱ्हास होत असल्याच्या घटना पुढे येत असताना विदर्भात सर्वाधिक जंगल, वन्यपशू असल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. मराठवाड्यात जंगलांची टक्केवारी नगण्यराज्यात ४७ अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली असली, तरी मराठवाड्यात जंगल हे २ ते ३ टक्के आहे. औरंगाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जंगलाची टक्केवारी फारच कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. कोकण, ठाणे, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव या भागांत जंगलक्षेत्र काहीअंशी आहे.राज्यात सहा व्याघ्र प्रक ल्पांचे संरक्षित व अतिसंरक्षित असे क्षेत्रफळ ७ हजार १९४ चौरस कि.मी. असून, पाच व्याघ्र प्रकल्प हे विदर्भात तर एक सह्याद्री व्याघ्रप्रकल्प हा सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. तसेच कोल्हा मार्ग, मुक्ता भवानी, ममनापूर व मोरगड हे जंगल संवर्धन क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.अभयारण्याची संख्या वाढल्याने वन्यपशूंच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भात जंगल अधिक प्रमाणात असल्याने वन्यपशूंच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर आली आहे.- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्पसहा व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्रफळ असे...मेऴघाट- २७६७.५२ चौरस कि.मी.ताडोबा- १७२७ चौरस कि.मी. पेंच- ७४१ चौरस कि.मी.सह्याद्री- ११६५ चौरस कि.मी.नवेगाव बांध-नागझिरा- १९०१ चौरस कि.मी.बोर- ७९९ चौरस कि.मी.