शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

एसटीच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले

By admin | Updated: April 9, 2016 03:44 IST

सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात.

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात. २0१४-१५ वर्षांशी तुलना करता २0१५-१६ या वर्षांत एसटीच्या अपघातांत घट झाली आहे. २0१४-१५मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. यामध्ये एसटी प्रवासी, एसटी कर्मचारी व अन्य वाहनांमधील प्रवाशांचा समावेश आहे. २0१५-१६मध्ये ४0७ जण जणांनी जीव गमावला आहे. गेल्या ४ वर्षांत एसटीच्या अपघातांत एकूण १ हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे.एसटीचे अपघात होऊ नयेत यासाठी चालकांमध्ये महामंडळाकडून जनजागृती केली जाते. दारू पिऊन वाहन न चालविणे, ओव्हरटेक न करणे, जलद गतीने वाहन न चालविण्याबाबत माहिती दिली जाते. एसटी महामंडळाकडून तर अपघात टाळण्यासाठी बसेसना ताशी ६५ किमीचे ‘स्पीड लॉक’ही लावले आहेत. या उपाययोजना करतानाच विनाअपघात प्रवास करणाऱ्या चालकांसाठी महामंडळाने प्रोत्साहन योजनाही सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपाययोजना केल्याने एसटी बसच्या अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. सरासरी वर्षाला जवळपास ४८५ जण एसटी अपघातात दगावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारपणे ६९ आहे. (प्रतिनिधी)