शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

एसटीच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले

By admin | Updated: April 9, 2016 03:44 IST

सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात.

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात. २0१४-१५ वर्षांशी तुलना करता २0१५-१६ या वर्षांत एसटीच्या अपघातांत घट झाली आहे. २0१४-१५मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. यामध्ये एसटी प्रवासी, एसटी कर्मचारी व अन्य वाहनांमधील प्रवाशांचा समावेश आहे. २0१५-१६मध्ये ४0७ जण जणांनी जीव गमावला आहे. गेल्या ४ वर्षांत एसटीच्या अपघातांत एकूण १ हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे.एसटीचे अपघात होऊ नयेत यासाठी चालकांमध्ये महामंडळाकडून जनजागृती केली जाते. दारू पिऊन वाहन न चालविणे, ओव्हरटेक न करणे, जलद गतीने वाहन न चालविण्याबाबत माहिती दिली जाते. एसटी महामंडळाकडून तर अपघात टाळण्यासाठी बसेसना ताशी ६५ किमीचे ‘स्पीड लॉक’ही लावले आहेत. या उपाययोजना करतानाच विनाअपघात प्रवास करणाऱ्या चालकांसाठी महामंडळाने प्रोत्साहन योजनाही सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपाययोजना केल्याने एसटी बसच्या अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. सरासरी वर्षाला जवळपास ४८५ जण एसटी अपघातात दगावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारपणे ६९ आहे. (प्रतिनिधी)