शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

व्याघ्रमृत्यूंच्या चौकशीचे ‘एनटीसीए’चे आदेश

By admin | Updated: July 28, 2016 01:00 IST

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी

- गणेश वासनिक, अमरावती

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाने (एनटीसीए) व्याघ्र प्रकल्पांंना दिले आहेत.वाघांची शिकार करून सीमेपार तस्करी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी एनटीसीएने सूक्ष्म परीक्षण करण्याचे ठरविले आहे. यात व्याघ्रमृत्यूचा व्हिसेरा अहवाल, तपास आणि गुप्तवार्ता मिळविण्याच्या कामात बहुशाखीय दृष्टिकोन ठेवून, शिकाऱ्यांना जेरबंद करणे, गुप्तवार्ता, गुप्तचर विभाग आणि एसआययू या एजन्सीमध्ये सहकार्य ठेवण्यासाठी प्रयत्न आदींवर भर दिला जाणार आहे.प्रयोगशाळेची उणीववाघांचे मृत्यू, शिकार झाल्यानंतर, त्यांचे अवयव, कातडीची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व्याघ्र प्रकल्पांकडे नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडताना वाघांचे अवयव मिळणे आवश्यक असते. मात्र, अवयवांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याने, याचा फायदा आरोपींना होत असल्याचे वास्तव आहे. प्रयोशशाळा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.वाघांच्या मृत्यूबाबत ‘एनटीसीए’ने समिती गठित केली आहे. ही समिती वाघांच्या मृत्यूची कारणे शोधून केंद्र सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करेल. मेळघाटात वाघांच्या मृत्यूंची एनटीसीएचे नागपूर, बेंगळूरचे आयजी, तर दिल्ली येथील डीआयजी चौकशी करतील. तसे पत्रदेखील प्राप्त झाले आहे.’- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.