शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

व्याघ्रमृत्यूंच्या चौकशीचे ‘एनटीसीए’चे आदेश

By admin | Updated: July 28, 2016 01:00 IST

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी

- गणेश वासनिक, अमरावती

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाने (एनटीसीए) व्याघ्र प्रकल्पांंना दिले आहेत.वाघांची शिकार करून सीमेपार तस्करी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी एनटीसीएने सूक्ष्म परीक्षण करण्याचे ठरविले आहे. यात व्याघ्रमृत्यूचा व्हिसेरा अहवाल, तपास आणि गुप्तवार्ता मिळविण्याच्या कामात बहुशाखीय दृष्टिकोन ठेवून, शिकाऱ्यांना जेरबंद करणे, गुप्तवार्ता, गुप्तचर विभाग आणि एसआययू या एजन्सीमध्ये सहकार्य ठेवण्यासाठी प्रयत्न आदींवर भर दिला जाणार आहे.प्रयोगशाळेची उणीववाघांचे मृत्यू, शिकार झाल्यानंतर, त्यांचे अवयव, कातडीची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व्याघ्र प्रकल्पांकडे नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडताना वाघांचे अवयव मिळणे आवश्यक असते. मात्र, अवयवांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याने, याचा फायदा आरोपींना होत असल्याचे वास्तव आहे. प्रयोशशाळा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.वाघांच्या मृत्यूबाबत ‘एनटीसीए’ने समिती गठित केली आहे. ही समिती वाघांच्या मृत्यूची कारणे शोधून केंद्र सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करेल. मेळघाटात वाघांच्या मृत्यूंची एनटीसीएचे नागपूर, बेंगळूरचे आयजी, तर दिल्ली येथील डीआयजी चौकशी करतील. तसे पत्रदेखील प्राप्त झाले आहे.’- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.