शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्रमृत्यूंच्या चौकशीचे ‘एनटीसीए’चे आदेश

By admin | Updated: July 28, 2016 01:00 IST

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी

- गणेश वासनिक, अमरावती

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाने (एनटीसीए) व्याघ्र प्रकल्पांंना दिले आहेत.वाघांची शिकार करून सीमेपार तस्करी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी एनटीसीएने सूक्ष्म परीक्षण करण्याचे ठरविले आहे. यात व्याघ्रमृत्यूचा व्हिसेरा अहवाल, तपास आणि गुप्तवार्ता मिळविण्याच्या कामात बहुशाखीय दृष्टिकोन ठेवून, शिकाऱ्यांना जेरबंद करणे, गुप्तवार्ता, गुप्तचर विभाग आणि एसआययू या एजन्सीमध्ये सहकार्य ठेवण्यासाठी प्रयत्न आदींवर भर दिला जाणार आहे.प्रयोगशाळेची उणीववाघांचे मृत्यू, शिकार झाल्यानंतर, त्यांचे अवयव, कातडीची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व्याघ्र प्रकल्पांकडे नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडताना वाघांचे अवयव मिळणे आवश्यक असते. मात्र, अवयवांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याने, याचा फायदा आरोपींना होत असल्याचे वास्तव आहे. प्रयोशशाळा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.वाघांच्या मृत्यूबाबत ‘एनटीसीए’ने समिती गठित केली आहे. ही समिती वाघांच्या मृत्यूची कारणे शोधून केंद्र सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करेल. मेळघाटात वाघांच्या मृत्यूंची एनटीसीएचे नागपूर, बेंगळूरचे आयजी, तर दिल्ली येथील डीआयजी चौकशी करतील. तसे पत्रदेखील प्राप्त झाले आहे.’- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.