शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एनटीसीच्या जमिनी विकणार नाही - गंगवार

By admin | Updated: February 19, 2016 03:31 IST

मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) बंद गिरण्यांच्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) बंद गिरण्यांच्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागांवर वस्त्रोद्योगाशी संबंधित पर्यायी उद्योग चालवले जातील, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार यांनी दिली.वांद्रे कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया सेंटर’ येथे वस्त्रोद्योगवरील परिसंवादानंतर पत्रकारांशी गंगवार बोलत होते. देशभरात एनटीसीच्या बंद गिरण्यांच्या जमिनींचा सरकारने आढावा घेतला असून, यापुढे या जमिनी आम्ही विकणार नाही. यातील बहुतांश जागा या शहरी भागात असल्याने तेथे पुन्हा कारखाने सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे तिथे वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य प्रकल्प चालविता येतील का, याची चाचपणी करण्यात येत आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गंगवार यांनी सांगितले.केंद्रीय वस्त्रोद्योग धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्यावर विविध मंत्रालयांशी चर्चा पूर्ण झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात येईल. यंदा कापूस उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने २४ टेक्सटाइल पार्कला परवानगी दिली असून, त्यामुळे साडेचार लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या देशात ७२ टेक्साटाइल पार्क सुरू आहेत, असे गंगवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)