शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

आता हसत-खेळत शिकता येणार गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 16:44 IST

किचकट वाटणारा गणित विषय सोडविण्यासाठी गणित पेट्यांमुळे विद्यार्थ्यांना नवसंजिवनी मिळाली

प्रा. लहू पवार / ऑनलाइऩ लोकमत

धुळे, दि. 16 - शैक्षणिक बदलाचा एक भाग म्हणून साक्री तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शासनामार्फत प्राप्त झालेल्या ४२५ ‘गणित पेट्यांचे वाटप’ तालुक्यातील २५६ जि.प. शाळांना वाटप केले आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना आता जि.प. शाळांमध्ये हसत-खेळत गणिताचे धडे दिले जाणार आहेत. किचकट वाटणारा गणित विषय सोडविण्यासाठी गणित पेट्यांमुळे विद्यार्थ्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. गणित समृद्धीकरणासाठी शासनाचा पुढाकार सध्याच्या काळात अनेक पालक त्यांच्या मुला-मुलींना जि.प. शाळेत शिक्षण घेण्यास नकार देतात. हा दृष्टीकोन बदलावा या चांगल्या हेतूने महाराष्ट्र शासनाने सर्व जि.प. मराठी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गणित समृद्धीकरण’ साहित्य संचाचे वाटप केले गेले. याचा फायदा मात्र, अल्पावधीतच पहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांसह पालकही या गणित पेट्या शाळेत जाऊन पहात आहेत. या नवीन प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. काही तरी नवीन पहायला मिळते आहे, असा या गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना वाटत आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे संभाषण वाढणार जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची प्रचंड भीती असते. मात्र, या गणित व भूमितीच्या विविध शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे संभाषण वाढणार आहे. या संभाषणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची भीती निश्चितच दूर होण्यास मदत होईल, असे साक्री तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. भिल यांनी सांगितले आहे. गणिताचा अभ्यास पक्का होणारप्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षकांना घाबरत असतात, म्हणून कोणीही प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, या शैक्षणिक साहित्यामुळे निदान त्रिकोण, वर्तुळ हातात घेऊन याचे नाव काय? त्याचा उपयोग काय? असे प्रश्न शिक्षकांना विचारायला सुरुवात झाली आहे. यामुळे शिक्षक- विद्यार्थ्यांचा संवाद वाढतो आहे. शैक्षणिक जीवनात गणित हा महत्त्वाचा विषय आहे. प्राथमिक शाळेपासून याचा पाया भक्कम असेल, तर शिखर गाठता येते, म्हणून गणिताचा चांगला सराव काळाची गरज असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी गणिततज्ज्ञ भास्कराचार्य गणित समृद्धीकरण कार्यक्रम राज्यात नवसंजिवनी देणारा ठरत आहे. यामुळे गणिताची गोडी निर्माण होत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर उपक्रम ग्रामीण भाग व आदिवासी पाड्यांवरील बहुतांश विद्यार्थी गणितापेक्षा शिक्षकांनाच जास्त घाबरतात, म्हणून शैक्षणिक शंका कोणीही विचारत नाहीत, मात्र, यामुळे संख्या रेषा, त्रिकोण, ठोकळे, मणी, चकत्या कशासाठी आहेत, हे जरी त्या विद्यार्थ्याने शिक्षकाला विचारले तरीही या साहित्यामुळे का होईना, परंतु, सुसंवाद होण्यास सुरुवात झाल्याचे अनेक पालकांनी सांगितले आहे. परिणामी, शिक्षण क्षेत्रात प्रात्यक्षिकांद्वारे दिलेले शिक्षण विद्यार्थी वर्गात जास्त व लवकर फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.