शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आता हसत-खेळत शिकता येणार गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 16:44 IST

किचकट वाटणारा गणित विषय सोडविण्यासाठी गणित पेट्यांमुळे विद्यार्थ्यांना नवसंजिवनी मिळाली

प्रा. लहू पवार / ऑनलाइऩ लोकमत

धुळे, दि. 16 - शैक्षणिक बदलाचा एक भाग म्हणून साक्री तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शासनामार्फत प्राप्त झालेल्या ४२५ ‘गणित पेट्यांचे वाटप’ तालुक्यातील २५६ जि.प. शाळांना वाटप केले आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना आता जि.प. शाळांमध्ये हसत-खेळत गणिताचे धडे दिले जाणार आहेत. किचकट वाटणारा गणित विषय सोडविण्यासाठी गणित पेट्यांमुळे विद्यार्थ्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. गणित समृद्धीकरणासाठी शासनाचा पुढाकार सध्याच्या काळात अनेक पालक त्यांच्या मुला-मुलींना जि.प. शाळेत शिक्षण घेण्यास नकार देतात. हा दृष्टीकोन बदलावा या चांगल्या हेतूने महाराष्ट्र शासनाने सर्व जि.प. मराठी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गणित समृद्धीकरण’ साहित्य संचाचे वाटप केले गेले. याचा फायदा मात्र, अल्पावधीतच पहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांसह पालकही या गणित पेट्या शाळेत जाऊन पहात आहेत. या नवीन प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. काही तरी नवीन पहायला मिळते आहे, असा या गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना वाटत आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे संभाषण वाढणार जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची प्रचंड भीती असते. मात्र, या गणित व भूमितीच्या विविध शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचे संभाषण वाढणार आहे. या संभाषणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची भीती निश्चितच दूर होण्यास मदत होईल, असे साक्री तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. भिल यांनी सांगितले आहे. गणिताचा अभ्यास पक्का होणारप्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षकांना घाबरत असतात, म्हणून कोणीही प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, या शैक्षणिक साहित्यामुळे निदान त्रिकोण, वर्तुळ हातात घेऊन याचे नाव काय? त्याचा उपयोग काय? असे प्रश्न शिक्षकांना विचारायला सुरुवात झाली आहे. यामुळे शिक्षक- विद्यार्थ्यांचा संवाद वाढतो आहे. शैक्षणिक जीवनात गणित हा महत्त्वाचा विषय आहे. प्राथमिक शाळेपासून याचा पाया भक्कम असेल, तर शिखर गाठता येते, म्हणून गणिताचा चांगला सराव काळाची गरज असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी गणिततज्ज्ञ भास्कराचार्य गणित समृद्धीकरण कार्यक्रम राज्यात नवसंजिवनी देणारा ठरत आहे. यामुळे गणिताची गोडी निर्माण होत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर उपक्रम ग्रामीण भाग व आदिवासी पाड्यांवरील बहुतांश विद्यार्थी गणितापेक्षा शिक्षकांनाच जास्त घाबरतात, म्हणून शैक्षणिक शंका कोणीही विचारत नाहीत, मात्र, यामुळे संख्या रेषा, त्रिकोण, ठोकळे, मणी, चकत्या कशासाठी आहेत, हे जरी त्या विद्यार्थ्याने शिक्षकाला विचारले तरीही या साहित्यामुळे का होईना, परंतु, सुसंवाद होण्यास सुरुवात झाल्याचे अनेक पालकांनी सांगितले आहे. परिणामी, शिक्षण क्षेत्रात प्रात्यक्षिकांद्वारे दिलेले शिक्षण विद्यार्थी वर्गात जास्त व लवकर फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.