शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आता मनपा क्षेत्रातही भरणार आठवडा बाजार

By admin | Updated: January 5, 2017 17:53 IST

राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील मोकळ्या जागा शेतमालाच्या आठवडा बाजारासाठी मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील मोकळ्या जागा शेतमालाच्या आठवडा बाजारासाठी मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 
सोलापूरात विजापूर रोडवरील कृषी खात्याच्या मैदानात थेट शेतमाल विक्रीसाठी श्री संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ यावेळी पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पणन विभागाचे सहाय्यक संचालक भास्कर पाटील यांनी शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना मांडली़ राज्यात सुरू झालेल्या आठवडे बाजारामुळे ग्राहकांना निवडक, स्वच्छ आणि ताज्या भाजीपाला-फळे अल्पदरात मिळत असून दलाल हटविल्यामुळे श्ेतकºयांना ही चांगला भाव मिळत असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली़ राज्यात आठवडे बाजाराची संकल्पना लोकप्रिय ठरत असल्याचे सांगताना सध्या पुण्यात ३५, मुंबईत ४० ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आठवडे बाजार सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ जागेची अडचण मुख्यमंत्र्यांनी दूर केल्याने राज्यात मोठ्या शहरात असे बाजार सुरू करणे सुलभ होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर मनपाची आडकाठी
सोलापूर महापालिकेकडे शेतकरी आठवडे बाजारासाठी मोकळ्या जागेची मागणी केली होती़ मात्र मनपाने त्यासाठी तीन लाखांची मागणी केली़ महानगरपालिकेच्या या धोरणाबाबत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली़ मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे मोठया शहरात आणखी आठवडे बाजार सुरू करण्यास चालना मिळेल़ अपार्टमेंटच्याजवळ गृहीणींना उत्तम भाजीपाला फळे खरेदी करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीची तारण योजना फलदायी
राज्य सरकारने १९८९ साली शेतमाल योजना सुरू केली़ दुर्भाग्याने त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले़ विद्यमान सरकारने ही योजना शेतकºयांपर्यंत पोहोचवली़ राज्यातील ५५ बाजार समित्यांमध्ये सध्या ती राबविली जात आहे़ यापुर्वी वर्षभरात ५० हजार क्विंटलपेक्षा कमी शेतमालाची साठवणुक होत असे़ यंदा डिसेंबरअखेर १ लाख २९ हजार क्विंटल शेतीमाल साठवण्यात आला आहे़ मार्चअखेर ५ लाखांचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचा मानस आहे अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ अवघ्या ६ टक्के व्याजदराने शेतकºयांच्या मालावर शासन उचल रक्कम देते़ गरजेनुसार अथवा बाजारात भाव वाढल्यास मालाची विक्री करता येते त्यामुळे शेतकºयांना चांगला दर मिळू शकतो़ कापणीनंतर दर कोसळतात़ त्यांचा लाभ व्यापारी घेतात असा आजवरचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.