शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता मनपा क्षेत्रातही भरणार आठवडा बाजार

By admin | Updated: January 5, 2017 17:53 IST

राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील मोकळ्या जागा शेतमालाच्या आठवडा बाजारासाठी मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील मोकळ्या जागा शेतमालाच्या आठवडा बाजारासाठी मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 
सोलापूरात विजापूर रोडवरील कृषी खात्याच्या मैदानात थेट शेतमाल विक्रीसाठी श्री संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ यावेळी पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पणन विभागाचे सहाय्यक संचालक भास्कर पाटील यांनी शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना मांडली़ राज्यात सुरू झालेल्या आठवडे बाजारामुळे ग्राहकांना निवडक, स्वच्छ आणि ताज्या भाजीपाला-फळे अल्पदरात मिळत असून दलाल हटविल्यामुळे श्ेतकºयांना ही चांगला भाव मिळत असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली़ राज्यात आठवडे बाजाराची संकल्पना लोकप्रिय ठरत असल्याचे सांगताना सध्या पुण्यात ३५, मुंबईत ४० ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आठवडे बाजार सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ जागेची अडचण मुख्यमंत्र्यांनी दूर केल्याने राज्यात मोठ्या शहरात असे बाजार सुरू करणे सुलभ होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर मनपाची आडकाठी
सोलापूर महापालिकेकडे शेतकरी आठवडे बाजारासाठी मोकळ्या जागेची मागणी केली होती़ मात्र मनपाने त्यासाठी तीन लाखांची मागणी केली़ महानगरपालिकेच्या या धोरणाबाबत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली़ मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे मोठया शहरात आणखी आठवडे बाजार सुरू करण्यास चालना मिळेल़ अपार्टमेंटच्याजवळ गृहीणींना उत्तम भाजीपाला फळे खरेदी करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीची तारण योजना फलदायी
राज्य सरकारने १९८९ साली शेतमाल योजना सुरू केली़ दुर्भाग्याने त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले़ विद्यमान सरकारने ही योजना शेतकºयांपर्यंत पोहोचवली़ राज्यातील ५५ बाजार समित्यांमध्ये सध्या ती राबविली जात आहे़ यापुर्वी वर्षभरात ५० हजार क्विंटलपेक्षा कमी शेतमालाची साठवणुक होत असे़ यंदा डिसेंबरअखेर १ लाख २९ हजार क्विंटल शेतीमाल साठवण्यात आला आहे़ मार्चअखेर ५ लाखांचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचा मानस आहे अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ अवघ्या ६ टक्के व्याजदराने शेतकºयांच्या मालावर शासन उचल रक्कम देते़ गरजेनुसार अथवा बाजारात भाव वाढल्यास मालाची विक्री करता येते त्यामुळे शेतकºयांना चांगला दर मिळू शकतो़ कापणीनंतर दर कोसळतात़ त्यांचा लाभ व्यापारी घेतात असा आजवरचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.