शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आता पाण्याचे एटीएम !

By admin | Updated: March 23, 2015 01:12 IST

कोणताही सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे, कारखाने नाहीत. आपल्याकडे निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो.

अविष्कार देशमुख ल्ल नागपूरकोणताही सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही. पाण्याशिवाय धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे, कारखाने नाहीत. आपल्याकडे निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो. काही ठिकाणी तर अतिवृष्टी होते. पण उन्हाळ्याचे शेवटचे दोन महिने पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. इतकी उठाठेव केल्यावरही मिळणारे पाणी शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही. हे टाळण्यासाठी आता पाण्याचे एटीएम ही नवी संकल्पना पुढे येत असून, याद्वारे १०० टक्के शुद्ध पाणी नागरिकांना पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहिला प्रयोग नागलवाडीतशहरातील नागरिकांना सध्या काही प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा होत असला तरी पाण्यात असणाऱ्या क्षारामुळे जडपणा येत आहे. मात्र आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत खासगी कंपन्यांच्या मदतीने शहरालगत अनेक भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र ‘एटीएम’ लावण्यात येणार आहे. याची सुरुवात हिंगणा येथील नागलवाडी ग्रामपंचायतीपासून होणार आहे़ नागरिकांना मिळेल वॉटर कार्डनागरिकांना वॉटर कार्ड देण्यात येणार असून, मुबलक पिण्याचे पाणी ‘प्रीपेड सिस्टीम’ने वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. टंचाईग्रस्त भागामध्ये प्रीपेड स्मार्टकार्ड सिस्टीमद्वारे पाणी पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना केवळ २० पैसे प्रति लिटर शुद्ध पाणी पुरवण्यात येईल. कार्ड स्वीप करा, पाणी मिळवावॉटर एटीएम पाणी पिण्यास लायक नसलेल्या बोअरवेल्सला अथवा पाण्याच्या टाकीला जोडण्यात येतील. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक अल्ट्रा फिल्टरेशन, नॅनो फिल्टरेशन, ओझोनिझेशन आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. स्टोरेज युनिटमध्ये एकदा पाणी पडल्यास लोक कार्ड स्वीप करून पाणी मिळवू शकतील. जेवढे लिटर पाणी हवे आहे तेवढा आकडा मशिनवर टाकून कार्ड स्वीप करावे लागेल. एटीएम २४ तास अविरत सेवा देणार आहे. नागरिकांनी पाणी किती वेळा काढले तसेच त्यांच्या कार्डमधून पैशांचा व्यवहार होण्यासाठी सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली आहे. सौरऊर्जेवर चालेल एटीएमग्रामीण भागात विजेची समस्या आहे. त्यामुळे हे एटीएम यंत्र २४ तास चालण्यासाठी बॅटरी बॅकअपची सोय करण्यात आली आहे. या एटीएमच्या टाकीवर सोलर यंत्र लावण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत राहील.च्कंपनीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी वॉटर एटीएमची सोय करून देतो. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांचा पुढाकार हवा. जवळपास चार लाख प्रति युनिटला खर्च येतो. नागरिकांना २० पैशांत १ लिटर शुद्ध पाणी यातून उपलब्ध होते, असे वॉटर केअर टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चरडे यांनी सांगितले.नागरिकांना वॉटर कार्ड देण्यात येणार असून, मुबलक पिण्याचे पाणी ‘प्रीपेड सिस्टीम’ने वाजवी दरात उपलब्ध होणार आहे.