शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

आता 'हॉटेल' च्या वीजवापरावर महावितरण ठेवणार 'वॉच'

By admin | Updated: November 17, 2016 18:11 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या विविध शहरातील मोठ्या हॉटेलांच्या संशयास्पद वीजवापरावर 'वॉच' ठेऊन वीजवापराच्या मुख्य कालावधीतच वीजयंत्रणेची विशेष पथकांद्वारे तपासणीची धडक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर, दि. 17 - पश्चिम महाराष्ट्राच्या विविध शहरातील मोठ्या हॉटेलांच्या संशयास्पद वीजवापरावर 'वॉच' ठेऊन वीजवापराच्या मुख्य कालावधीतच वीजयंत्रणेची विशेष पथकांद्वारे तपासणीची धडक कारवाई करण्यात येणार आहे़ याबाबत प्राथमिक स्तरावरील कारवाई प्रादेशिक कार्यालयाने सुरु केली आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी वीजग्राहकांच्या वीजचोरीच्या मोहिमा यशस्वीतेनंतर आता राज्यातील हॉटेलमधील वीजवापरावर महावितरण अधिकच लक्ष ठेवणार आहे़ त्यामुळे आता राज्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणणार यात शंका नाही़

दरम्यान, पुणे शहरातील काही मोठ्या हॉटेलांमधील वीजयंत्रणेची रविवारी, पाच तासांच्या कालावधीत अचानक तपासणी करण्यात आली. यात ५ हॉटेलमधील वीजवापरात अनियमित दिसून आली आहे़ त्याच धर्तीवर महावितरणच्या विशेष पथकाकडून धाडसत्र सुरू करण्यात येणार आहे़

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाने सुमारे ३० किलोवॅटपेक्षा अधिक वीजभाराची वीजजोडणी असलेल्या मोठ्या हॉटेलांमधील गेल्या काही महिन्यांच्या वीजवापराचे विश्लेषण सुरु केले आहे. एकाच दिवशी तसेच वीजवापराच्या मुख्य कालावधीतच या हॉटेलांमधील वीजयंत्रणेची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयाकडून विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक पथकात दक्षता व सुरक्षा आणि चाचणी विभागाच्या ९ अधिकांऱ्याचा समावेश आहे. पुणे शहरातील विविध ठिकाणच्या काही हॉटेलांमध्ये वीजवापर संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

त्यानुसार या पथकांनी हॉटेलांमधील वीजमीटर व यंत्रणेची तपासणी केली. त्यात पाच हॉटेलमधील वीजवापर अनियमित असल्याचे दिसून आले. एका हॉटेलमधील वीजयंत्रणेत फेरफार झाल्याचे आढळून आले आहे. या पाचही हॉटेलांमधील अनियमिततेबाबत आणखी तांत्रिक तपासणीचे काम सुरु आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत अशाच मोहिमा राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मोठ्या हॉटेलांमधील वीजवापराचे महावितरणकडून विश्लेषण करण्यात येत आहे. संशयास्पद वीजवापर दिसून येत असलेल्या हॉटेलांच्या वीजयंत्रणेची अचानक तपासणीही करण्यात येत आहे. यात वीजचोरी किंवा अनधिकृत वीजवापर आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजचोरीचे प्रकार टाळावेत व वीजयंत्रणेच्या वायरिंगमध्ये किंवा यंत्रणेत कोणत्याही प्रकारचे फेरफार करू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.