शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आता 'हॉटेल' च्या वीजवापरावर महावितरण ठेवणार 'वॉच'

By admin | Updated: November 17, 2016 18:11 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या विविध शहरातील मोठ्या हॉटेलांच्या संशयास्पद वीजवापरावर 'वॉच' ठेऊन वीजवापराच्या मुख्य कालावधीतच वीजयंत्रणेची विशेष पथकांद्वारे तपासणीची धडक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर, दि. 17 - पश्चिम महाराष्ट्राच्या विविध शहरातील मोठ्या हॉटेलांच्या संशयास्पद वीजवापरावर 'वॉच' ठेऊन वीजवापराच्या मुख्य कालावधीतच वीजयंत्रणेची विशेष पथकांद्वारे तपासणीची धडक कारवाई करण्यात येणार आहे़ याबाबत प्राथमिक स्तरावरील कारवाई प्रादेशिक कार्यालयाने सुरु केली आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी वीजग्राहकांच्या वीजचोरीच्या मोहिमा यशस्वीतेनंतर आता राज्यातील हॉटेलमधील वीजवापरावर महावितरण अधिकच लक्ष ठेवणार आहे़ त्यामुळे आता राज्यातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणणार यात शंका नाही़

दरम्यान, पुणे शहरातील काही मोठ्या हॉटेलांमधील वीजयंत्रणेची रविवारी, पाच तासांच्या कालावधीत अचानक तपासणी करण्यात आली. यात ५ हॉटेलमधील वीजवापरात अनियमित दिसून आली आहे़ त्याच धर्तीवर महावितरणच्या विशेष पथकाकडून धाडसत्र सुरू करण्यात येणार आहे़

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाने सुमारे ३० किलोवॅटपेक्षा अधिक वीजभाराची वीजजोडणी असलेल्या मोठ्या हॉटेलांमधील गेल्या काही महिन्यांच्या वीजवापराचे विश्लेषण सुरु केले आहे. एकाच दिवशी तसेच वीजवापराच्या मुख्य कालावधीतच या हॉटेलांमधील वीजयंत्रणेची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयाकडून विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक पथकात दक्षता व सुरक्षा आणि चाचणी विभागाच्या ९ अधिकांऱ्याचा समावेश आहे. पुणे शहरातील विविध ठिकाणच्या काही हॉटेलांमध्ये वीजवापर संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

त्यानुसार या पथकांनी हॉटेलांमधील वीजमीटर व यंत्रणेची तपासणी केली. त्यात पाच हॉटेलमधील वीजवापर अनियमित असल्याचे दिसून आले. एका हॉटेलमधील वीजयंत्रणेत फेरफार झाल्याचे आढळून आले आहे. या पाचही हॉटेलांमधील अनियमिततेबाबत आणखी तांत्रिक तपासणीचे काम सुरु आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत अशाच मोहिमा राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मोठ्या हॉटेलांमधील वीजवापराचे महावितरणकडून विश्लेषण करण्यात येत आहे. संशयास्पद वीजवापर दिसून येत असलेल्या हॉटेलांच्या वीजयंत्रणेची अचानक तपासणीही करण्यात येत आहे. यात वीजचोरी किंवा अनधिकृत वीजवापर आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजचोरीचे प्रकार टाळावेत व वीजयंत्रणेच्या वायरिंगमध्ये किंवा यंत्रणेत कोणत्याही प्रकारचे फेरफार करू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.