शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

कृषी विद्यापीठाला आता हक्काचा कुलगुरु

By admin | Updated: August 12, 2015 23:16 IST

निकष बदलले : आॅक्टोबरनंतर प्रलंबित कामांचा होणार निपटारा--लोकमतचा प्रभाव

दापोली : कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव असावा, या अटीमुळे गेल्यावर्षी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी एकही पात्र उमेदवार मिळाला नसल्याचा अहवाल देऊन निवड समितीने भरती प्रक्रिया रद्द केली होती. आता शासनाने कुलगुरुपदाचे निकष बदलले आहेत. नव्या निकषानुसार दापोली कृषी विद्यापीठात १५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे निवड समितीने जाहीर केल्याने आॅक्टोबरअखेर विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांचा कार्यकाल २० डिसेंबर २०१४ रोजी संपला. त्यांचा कार्यकाल संपण्याआधी तीन महिने नव्या कुलगुरु निवडीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली होती. निवड समितीने पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले होते. आलेल्या अर्जांतून छाननी होऊन निवड समितीने कुलगुरु पदासाठी मुलाखती घेतल्या. त्यातून अंतिम निवडीसाठी पाच जणांची यादी तयार करण्यात आली. या पाचपैकी एका उमेदवाराला कुलगुरुपदाची संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु असे न होता कुलगुरुपदासाठी पाच वर्षे संचालकाचा अनुभव या निकषात राज्यातील एकही उमेदवार बसत नाही. तसेच ज्यांची पाच वर्षे पूर्ण आहेत, अशा पात्र उमेदवारांना पाच वर्षे वयोमर्यादेमुळे कुलगुरुपदाची संधी मिळत नव्हती. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी लायक उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे, असा अहवाल निवड समितीने शासनाला दिल्यामुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा पदभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. गेली ९ महिने दापोली कृषी विद्यापीठाचा कारभार परभणी कृषी विद्यापीठातून सुरु होता. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया रद्द झाल्यावर कुलगुरु पदासाठी राज्यातील एकही कृषी शास्त्रज्ञ पात्र नसेल तर निकष बदलावे यासाठी हालचाली सुरु झाल्या. दापोली कृषी विद्यापीठापाठोपाठ राहुरी कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या नेमणुका आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठात पात्र उमेदवार नसेल तर अमराठी भाषिक कुलगुरु बाहेरच्या राज्यातून आल्यास कृषी क्षेत्राचे नुकसान होऊ शकते. कुलगुरु पदाचे निकष काय असावेत, यासाठी कृषी विद्यापीठातून हरकती मागवण्यात आल्या होत्या. कृषी विद्यापीठाच्या सूचनांचे पालन करुन सुवर्णमध्य काढत शासनाने नवीन निकष लावल्यामुळे कृषी विद्यापीठ भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या विषयावर वृत्ताबरोबरच संपादकीयही लिहून या विषयाला वाचा फोडली होती. अखेरीस राज्य शासनाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून, कुलगुरूंबाबतचे निकषच बदलल्याने आता कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.कृषी विद्यापीठ कुलगुरुंबाबत लोकमतने केला होता पाठपुरावा.कुलगुरुपदाचे निकष बदलण्याची सर्वप्रथम दिली होती ‘लोकमत’ने बातमी.दापोली कृषी विद्यापीठातील डॉ. संजय भावे, डॉ. उत्तमकुमार महाडकर, डॉ. एस. एस. बुरटे या विभागप्रमुखांनाही संधी.