शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कृषी विद्यापीठाला आता हक्काचा कुलगुरु

By admin | Updated: August 12, 2015 23:16 IST

निकष बदलले : आॅक्टोबरनंतर प्रलंबित कामांचा होणार निपटारा--लोकमतचा प्रभाव

दापोली : कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी संचालकपदाचा पाच वर्षांचा अनुभव असावा, या अटीमुळे गेल्यावर्षी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी एकही पात्र उमेदवार मिळाला नसल्याचा अहवाल देऊन निवड समितीने भरती प्रक्रिया रद्द केली होती. आता शासनाने कुलगुरुपदाचे निकष बदलले आहेत. नव्या निकषानुसार दापोली कृषी विद्यापीठात १५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे निवड समितीने जाहीर केल्याने आॅक्टोबरअखेर विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांचा कार्यकाल २० डिसेंबर २०१४ रोजी संपला. त्यांचा कार्यकाल संपण्याआधी तीन महिने नव्या कुलगुरु निवडीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली होती. निवड समितीने पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले होते. आलेल्या अर्जांतून छाननी होऊन निवड समितीने कुलगुरु पदासाठी मुलाखती घेतल्या. त्यातून अंतिम निवडीसाठी पाच जणांची यादी तयार करण्यात आली. या पाचपैकी एका उमेदवाराला कुलगुरुपदाची संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु असे न होता कुलगुरुपदासाठी पाच वर्षे संचालकाचा अनुभव या निकषात राज्यातील एकही उमेदवार बसत नाही. तसेच ज्यांची पाच वर्षे पूर्ण आहेत, अशा पात्र उमेदवारांना पाच वर्षे वयोमर्यादेमुळे कुलगुरुपदाची संधी मिळत नव्हती. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी लायक उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे, असा अहवाल निवड समितीने शासनाला दिल्यामुळे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा पदभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेंकटेश्वरलू यांच्याकडे सोपवण्यात आला. गेली ९ महिने दापोली कृषी विद्यापीठाचा कारभार परभणी कृषी विद्यापीठातून सुरु होता. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया रद्द झाल्यावर कुलगुरु पदासाठी राज्यातील एकही कृषी शास्त्रज्ञ पात्र नसेल तर निकष बदलावे यासाठी हालचाली सुरु झाल्या. दापोली कृषी विद्यापीठापाठोपाठ राहुरी कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या नेमणुका आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठात पात्र उमेदवार नसेल तर अमराठी भाषिक कुलगुरु बाहेरच्या राज्यातून आल्यास कृषी क्षेत्राचे नुकसान होऊ शकते. कुलगुरु पदाचे निकष काय असावेत, यासाठी कृषी विद्यापीठातून हरकती मागवण्यात आल्या होत्या. कृषी विद्यापीठाच्या सूचनांचे पालन करुन सुवर्णमध्य काढत शासनाने नवीन निकष लावल्यामुळे कृषी विद्यापीठ भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या विषयावर वृत्ताबरोबरच संपादकीयही लिहून या विषयाला वाचा फोडली होती. अखेरीस राज्य शासनाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून, कुलगुरूंबाबतचे निकषच बदलल्याने आता कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु मिळणार आहे.कृषी विद्यापीठ कुलगुरुंबाबत लोकमतने केला होता पाठपुरावा.कुलगुरुपदाचे निकष बदलण्याची सर्वप्रथम दिली होती ‘लोकमत’ने बातमी.दापोली कृषी विद्यापीठातील डॉ. संजय भावे, डॉ. उत्तमकुमार महाडकर, डॉ. एस. एस. बुरटे या विभागप्रमुखांनाही संधी.