शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आता उद्धव ठाकरेच घेतील केमिकल झोनबाबतचा निर्णय

By admin | Updated: September 8, 2015 23:37 IST

रवींद्र वायकर : शिवसेनेला विश्वासात घ्यायला हवे होते..

.रत्नागिरी : भाजपबरोबरच शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकणातील केमिकल झोनबाबत निर्णय घेताना शिवसेनेलाही विश्वासात घ्यायला हवे होते, यात दुमत नाही. याप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.जिल्ह्यात १,६५,०८६ गणेशांची प्रतिष्ठापना होणार आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव हे सण मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने जिल्ह्यात येण्याची संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने विविध विभागांना सुसज्जतेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कशेडी घाट उतरल्यानंतर एकूण १९ ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच एस. टी. आणि कोकण रेल्वे या सेवांमध्ये समन्वय व्हावा, यासाठी सर्व एस. टी. फेऱ्या व्हाया रेल्वे स्टेशन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आपण बांधकाम विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले. यापुढे पाच वर्षांच्या आत रस्त्याची दुरवस्था झाल्यास संबंधित ठेकेदाराने ते दुरूस्त करावेत. त्यासाठी ठेकेदाराबरोबरच संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, असे ते म्हणाले.जिल्ह्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेली २९२ गावे वगळून उर्वरित गावांसाठी रॉयल्टी भरून हातपाटी उत्खननासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. आॅक्टोबरअखेर यांत्रिकी उत्खननाला परवानगी देणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात ५६१६ बचत गट आहेत. त्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांना मुंबईमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपबरोबर शिवसेना सत्तेत असली तरी दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे कोणतेही काम करताना शिवसेनेप्रमाणेच केले जाईल. आम्ही जनतेसाठीच बसलोय, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)साकवांकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्यजिल्ह्यातील ५९७ साकव नादुरूस्त आहेत, याबाबतचे वृत्त आपल्या निदर्शनास आले आहे. या साकवांकडे लक्ष दिलेले नाही, हे पालकमंत्र्यांनी मान्य केले. या साकवांसाठी साडेआठ कोटीचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी वेगळ्या तऱ्हेची उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.