शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता उद्धव ठाकरेच घेतील केमिकल झोनबाबतचा निर्णय

By admin | Updated: September 8, 2015 23:37 IST

रवींद्र वायकर : शिवसेनेला विश्वासात घ्यायला हवे होते..

.रत्नागिरी : भाजपबरोबरच शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकणातील केमिकल झोनबाबत निर्णय घेताना शिवसेनेलाही विश्वासात घ्यायला हवे होते, यात दुमत नाही. याप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.जिल्ह्यात १,६५,०८६ गणेशांची प्रतिष्ठापना होणार आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव हे सण मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने जिल्ह्यात येण्याची संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने विविध विभागांना सुसज्जतेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कशेडी घाट उतरल्यानंतर एकूण १९ ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच एस. टी. आणि कोकण रेल्वे या सेवांमध्ये समन्वय व्हावा, यासाठी सर्व एस. टी. फेऱ्या व्हाया रेल्वे स्टेशन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आपण बांधकाम विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले. यापुढे पाच वर्षांच्या आत रस्त्याची दुरवस्था झाल्यास संबंधित ठेकेदाराने ते दुरूस्त करावेत. त्यासाठी ठेकेदाराबरोबरच संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, असे ते म्हणाले.जिल्ह्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेली २९२ गावे वगळून उर्वरित गावांसाठी रॉयल्टी भरून हातपाटी उत्खननासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. आॅक्टोबरअखेर यांत्रिकी उत्खननाला परवानगी देणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात ५६१६ बचत गट आहेत. त्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांना मुंबईमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपबरोबर शिवसेना सत्तेत असली तरी दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे कोणतेही काम करताना शिवसेनेप्रमाणेच केले जाईल. आम्ही जनतेसाठीच बसलोय, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)साकवांकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्यजिल्ह्यातील ५९७ साकव नादुरूस्त आहेत, याबाबतचे वृत्त आपल्या निदर्शनास आले आहे. या साकवांकडे लक्ष दिलेले नाही, हे पालकमंत्र्यांनी मान्य केले. या साकवांसाठी साडेआठ कोटीचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी वेगळ्या तऱ्हेची उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.