शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आता उद्धव ठाकरेच घेतील केमिकल झोनबाबतचा निर्णय

By admin | Updated: September 8, 2015 23:37 IST

रवींद्र वायकर : शिवसेनेला विश्वासात घ्यायला हवे होते..

.रत्नागिरी : भाजपबरोबरच शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकणातील केमिकल झोनबाबत निर्णय घेताना शिवसेनेलाही विश्वासात घ्यायला हवे होते, यात दुमत नाही. याप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.जिल्ह्यात १,६५,०८६ गणेशांची प्रतिष्ठापना होणार आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव हे सण मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने जिल्ह्यात येण्याची संख्या लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने विविध विभागांना सुसज्जतेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कशेडी घाट उतरल्यानंतर एकूण १९ ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच एस. टी. आणि कोकण रेल्वे या सेवांमध्ये समन्वय व्हावा, यासाठी सर्व एस. टी. फेऱ्या व्हाया रेल्वे स्टेशन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आपण बांधकाम विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले. यापुढे पाच वर्षांच्या आत रस्त्याची दुरवस्था झाल्यास संबंधित ठेकेदाराने ते दुरूस्त करावेत. त्यासाठी ठेकेदाराबरोबरच संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, असे ते म्हणाले.जिल्ह्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेली २९२ गावे वगळून उर्वरित गावांसाठी रॉयल्टी भरून हातपाटी उत्खननासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. आॅक्टोबरअखेर यांत्रिकी उत्खननाला परवानगी देणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात ५६१६ बचत गट आहेत. त्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांना मुंबईमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपबरोबर शिवसेना सत्तेत असली तरी दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे कोणतेही काम करताना शिवसेनेप्रमाणेच केले जाईल. आम्ही जनतेसाठीच बसलोय, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)साकवांकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्यजिल्ह्यातील ५९७ साकव नादुरूस्त आहेत, याबाबतचे वृत्त आपल्या निदर्शनास आले आहे. या साकवांकडे लक्ष दिलेले नाही, हे पालकमंत्र्यांनी मान्य केले. या साकवांसाठी साडेआठ कोटीचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी वेगळ्या तऱ्हेची उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.