शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

आता हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचे आंदोलन

By admin | Updated: April 15, 2016 12:38 IST

शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूर, दि.१५ - शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.  आता त्र्यंबकेश्वर, शबरीमाला आणि मुुंबईतील हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी आंदोलन केले जाणार आहे. हाजी अली दर्ग्यातील प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर राज्य सरकारने आपले म्हणणे मांडले आहे. येथील प्रवेशाच्या मुद्द्याबाबत काही मुस्लीम महिला संघटना मला भेटल्या आहेत. मुंबईत पुढील आठवड्यात त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती ठरविणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

‘अंबाबाई देवीच्या मंदिरातील बुधवारची स्थिती पाहता, हिंदुत्ववादी संघटनांनी माझ्या हत्येचा कट रचला होता. मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी माझ्यावर हल्ला झाला. सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित हल्ला करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा माझाही दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणे खून होईल,’ अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. पूर्ण स्थिती माहीत असूनही बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयात या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

अंबाबाईच्या मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी बुधवारी रात्री देसाई यांना विरोधी महिलांनी मारहाण केली होती. त्यानंतर, त्यांना रात्री उशिरा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देसाई म्हणाल्या, ‘अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याची पूर्वकल्पना पोलीस, प्रशासनाला दिली होती. तरीही पोलिसांनी १४४ कलम लावून माझ्यासमवेत आलेल्या काही महिलांना ताब्यात घेतले. मंदिरात मला विरोध करणारे बघितल्यानंतर, १४४ कलम केवळ भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनाच लागू होते का? असा प्रश्न निर्माण होतो. मंदिरात गेल्यानंतर पोलीस असतानाही माझ्यावर हल्ला झाला. त्यात गळा दाबला, कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. या वेळी पोलिसांचे नियोजन चुकीचे होते. शिवाय, ते बघ्याची भूमिका घेतात हे आश्चर्यकारक आहे.

त्यांनी संबंधित हल्लेखोरांना अडवून बाहेर काढले असते, तर हा प्रकार घडला नसता. एकूणच मंदिरातील स्थिती पाहता, हिंदुत्ववादी संघटना आणि मला विरोध करणाऱ्यांनी पूर्णपणे माझ्या हत्येचा कट रचला होता हे दिसून आले. राज्य व केंद्रात आमचे सरकार असल्याचे संबंधित संघटनांकडून बोलले जाते. त्याचा प्रत्यय मला बुधवारी आला.’ मारहाणीची स्वतंत्र चौकशी- प्रदीप देशपांडेश्रीअंबाबाई देवी मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांना सादर केला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांना सांगितले.