मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावे. नरेंद्र मोदींच्या धर्तीवर ‘अब की बार, राज सरकार’चा नारा देत निवडणुकीत उतरण्याचा निर्धार नेत्यांनी राज यांच्या अनुपस्थितीत झालेल्या मेळाव्यात केला. लोकसभा निवडणुकीतील सपशेल पराभवाच्या पार्श्वभूमीवर माटुंगा येथील यशवंतराव सभागृहात मनसे पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मनसे नेत्यांनी आणि पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री पदाचे दावरदार म्हणून राज ठाकरे यांचे ब्रँडींग करण्याची मागणी लावून धरली. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. शिशिर शिंदे म्हणाले की, राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आ. प्रविण दरेकर म्हणाले की, ‘पदाधिकार्यांच्या मेळाव्यास स्वत: राज ठाकरे यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. ३१ तारखेच्या जाहीर सभेत ते आपली भूमिका मांडणार आहेत.’ (प्रतिनिधी)
अब की बार, राज सरकार; मनसे नेत्यांचा निर्धार
By admin | Updated: May 23, 2014 04:20 IST