शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

आता होणार ‘चाय पे शादी’!

By admin | Updated: January 28, 2016 03:40 IST

गरीब मुस्लीम कुटुंबातील वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत मंगळवारपासून ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात

- प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद

गरीब मुस्लीम कुटुंबातील वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत मंगळवारपासून ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यानुसार येत्या १५ दिवसांत पहिली ‘चाय पे शादी’ होणार आहे. मुस्लीम समाजात अनेक गरीब कुटुंबे मुलीच्या लग्नासाठी काढलेली मोठी कर्जे आयुष्यभर फेडत बसतात, असे चित्र दिसते. हे ध्यानी घेऊनच हारून मुकाती इस्लामिक सेंटरने मुस्लीम समाजातील गरिबांसाठी ‘चाय पे शादी’ उपक्रम सुरू केला आहे. याची माहिती देताना सेंटरचे संचालक युसूफ मुकाती यांनी सांगितले की, मुस्लीम समाजात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वधुपिता गरीब असला तरी मुलीच्या लग्नाला एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतोच. यात जेवण, हॉल भाड्याचा खर्च जास्त असतो. लग्नासाठी वधुपिता ८ टक्के व्याजदराने खासगी कर्ज घेतो व आयुष्यभर त्याचा भार त्याच्या डोक्यावर असतो. अनेकदा कर्जाचे हप्ते फेडता-फेडता संपूर्ण कुटुंबच कोलमोडून जाते. वधू-वर पित्यांनी इच्छा दर्शविली तर आम्ही ‘चायपे शादी’ लावून देऊ, असे त्यांनी सांगितले.‘सौतन’ चित्रपटातील ‘शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसी लिए मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया हैं’ हे गाणे एकेकाळी खूप गाजले. तर, वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘चाय पे चर्चा’ गाजली. आता हाच सर्वांना प्रिय असणारा आणि चर्चेतला ‘चहा’ वधूपित्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविणार आहे.

नेमके काय करणार?- मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी केंद्रातील हॉल नि:शुल्क देणार- लग्न लावण्यासाठी काझीची व्यवस्थाही मोफत - ७०० ते ८०० पाहुण्यांसाठी मोफत चहा संपर्क : ‘हारुन मुकाती इस्लामिक सेंटर’, औरंगाबाद, मोबाईल - ९९२३१०८४८४मॅरेज ब्युरोमध्ये समुपदेशनहारून मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने वर्षभरापासून मुस्लीम समाजासाठी विनाशुल्क ‘मॅरेज ब्युरो’ चालविला जातो. आजपर्यंत विवाहेच्छुक १२०० तरुणी व ६५० तरुणांची नोंद झाली. दर महिन्याला यातून ३० ते ३५ जणांचे विवाह जुळविले जातात.श्रीमंतांनी पुढे यावे मुस्लीम समाजातील श्रीमंतांनी आपल्या मुला-मुलीच्या लग्नासोबत गरिबांच्या मुला-मुलींचेही लग्न लावून दिले तर एक आदर्श निर्माण होईल, असे आवाहन युसूफ मुकाती यांनी केले.