शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

आता होणार ‘चाय पे शादी’!

By admin | Updated: January 28, 2016 03:40 IST

गरीब मुस्लीम कुटुंबातील वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत मंगळवारपासून ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात

- प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद

गरीब मुस्लीम कुटुंबातील वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत मंगळवारपासून ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यानुसार येत्या १५ दिवसांत पहिली ‘चाय पे शादी’ होणार आहे. मुस्लीम समाजात अनेक गरीब कुटुंबे मुलीच्या लग्नासाठी काढलेली मोठी कर्जे आयुष्यभर फेडत बसतात, असे चित्र दिसते. हे ध्यानी घेऊनच हारून मुकाती इस्लामिक सेंटरने मुस्लीम समाजातील गरिबांसाठी ‘चाय पे शादी’ उपक्रम सुरू केला आहे. याची माहिती देताना सेंटरचे संचालक युसूफ मुकाती यांनी सांगितले की, मुस्लीम समाजात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वधुपिता गरीब असला तरी मुलीच्या लग्नाला एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतोच. यात जेवण, हॉल भाड्याचा खर्च जास्त असतो. लग्नासाठी वधुपिता ८ टक्के व्याजदराने खासगी कर्ज घेतो व आयुष्यभर त्याचा भार त्याच्या डोक्यावर असतो. अनेकदा कर्जाचे हप्ते फेडता-फेडता संपूर्ण कुटुंबच कोलमोडून जाते. वधू-वर पित्यांनी इच्छा दर्शविली तर आम्ही ‘चायपे शादी’ लावून देऊ, असे त्यांनी सांगितले.‘सौतन’ चित्रपटातील ‘शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसी लिए मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया हैं’ हे गाणे एकेकाळी खूप गाजले. तर, वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘चाय पे चर्चा’ गाजली. आता हाच सर्वांना प्रिय असणारा आणि चर्चेतला ‘चहा’ वधूपित्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविणार आहे.

नेमके काय करणार?- मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी केंद्रातील हॉल नि:शुल्क देणार- लग्न लावण्यासाठी काझीची व्यवस्थाही मोफत - ७०० ते ८०० पाहुण्यांसाठी मोफत चहा संपर्क : ‘हारुन मुकाती इस्लामिक सेंटर’, औरंगाबाद, मोबाईल - ९९२३१०८४८४मॅरेज ब्युरोमध्ये समुपदेशनहारून मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने वर्षभरापासून मुस्लीम समाजासाठी विनाशुल्क ‘मॅरेज ब्युरो’ चालविला जातो. आजपर्यंत विवाहेच्छुक १२०० तरुणी व ६५० तरुणांची नोंद झाली. दर महिन्याला यातून ३० ते ३५ जणांचे विवाह जुळविले जातात.श्रीमंतांनी पुढे यावे मुस्लीम समाजातील श्रीमंतांनी आपल्या मुला-मुलीच्या लग्नासोबत गरिबांच्या मुला-मुलींचेही लग्न लावून दिले तर एक आदर्श निर्माण होईल, असे आवाहन युसूफ मुकाती यांनी केले.