शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

आता विद्यार्थ्यांच्या दारी ज्ञानगंगा

By admin | Updated: August 2, 2016 05:26 IST

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्यापर्यंत जाणेदेखील शक्य नसते.

योगेश पांडे,

नागपूर- गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्यापर्यंत जाणेदेखील शक्य नसते. अशा मुलांपर्यंत ‘ज्ञानगंगा’ पोहोचावी यासाठी आता ‘इग्नू’तर्फे (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) यावर्षीपासून फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत शिक्षकच दुर्गम भागात जाऊन विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत.घरी बसूनदेखील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हा ‘इग्नू’चा महत्त्वाचा हेतू असतो. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, हादेखील प्रयत्न करण्यात येतो. नक्षलप्रभावित व विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ‘इग्नू’चे उपकेंद्र आहे. तथापि, अतिदुर्गम भागात राहणाऱ्यांना दोन आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदादेखील तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनदेखील अनेक आदिवासी युवक-युवती उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन ‘इग्नू’ने फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.दुर्गम भागात गावोगावी फिरून ‘इग्नू’तर्फे प्रवेश शिबिर घेण्यात येत आहेत. एखाद्या गावातील पंचायत कार्यालय किंवा मोकळ्या सभागृहात अथवा तत्सम सोयीच्या ठिकाणी हे विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्यात येणार आहेत.>रोजगाराधिष्ठित अभ्यासक्रमांवर भर‘इग्नू’च्या या फिरत्या अध्ययन केंद्राच्या माध्यमातून पारंपरिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येईल. प्रात्यक्षिक असलेल्या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणे शक्य होणार नाही. परंतु रोजगाराधिष्ठित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. >गडचिरोलीतील अतिमागास भागातील विद्यार्थ्यांची समस्या लक्षात आल्यानंतरच फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्याचा विचार आला. अंतर्गत भागातील खेड्यांमध्ये जेथे जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी होईल, तेथे शिक्षक जाऊन शिकवतील. हे वर्ग किती अंतराने भरतील किंवा कोणत्या दिवशी भरतील यासंदर्भात विद्यार्थ्यांची सोय पाहिली जाईल. - डॉ. पी. शिवस्वरूप, संचालक, नागपूर विभागीय केंद्र, इग्नू