शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

आता विद्यार्थ्यांच्या दारी ज्ञानगंगा

By admin | Updated: August 2, 2016 05:26 IST

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्यापर्यंत जाणेदेखील शक्य नसते.

योगेश पांडे,

नागपूर- गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्यापर्यंत जाणेदेखील शक्य नसते. अशा मुलांपर्यंत ‘ज्ञानगंगा’ पोहोचावी यासाठी आता ‘इग्नू’तर्फे (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) यावर्षीपासून फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत शिक्षकच दुर्गम भागात जाऊन विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत.घरी बसूनदेखील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हा ‘इग्नू’चा महत्त्वाचा हेतू असतो. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, हादेखील प्रयत्न करण्यात येतो. नक्षलप्रभावित व विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ‘इग्नू’चे उपकेंद्र आहे. तथापि, अतिदुर्गम भागात राहणाऱ्यांना दोन आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदादेखील तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनदेखील अनेक आदिवासी युवक-युवती उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन ‘इग्नू’ने फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.दुर्गम भागात गावोगावी फिरून ‘इग्नू’तर्फे प्रवेश शिबिर घेण्यात येत आहेत. एखाद्या गावातील पंचायत कार्यालय किंवा मोकळ्या सभागृहात अथवा तत्सम सोयीच्या ठिकाणी हे विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्यात येणार आहेत.>रोजगाराधिष्ठित अभ्यासक्रमांवर भर‘इग्नू’च्या या फिरत्या अध्ययन केंद्राच्या माध्यमातून पारंपरिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येईल. प्रात्यक्षिक असलेल्या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणे शक्य होणार नाही. परंतु रोजगाराधिष्ठित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. >गडचिरोलीतील अतिमागास भागातील विद्यार्थ्यांची समस्या लक्षात आल्यानंतरच फिरते अध्ययन केंद्र सुरू करण्याचा विचार आला. अंतर्गत भागातील खेड्यांमध्ये जेथे जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी होईल, तेथे शिक्षक जाऊन शिकवतील. हे वर्ग किती अंतराने भरतील किंवा कोणत्या दिवशी भरतील यासंदर्भात विद्यार्थ्यांची सोय पाहिली जाईल. - डॉ. पी. शिवस्वरूप, संचालक, नागपूर विभागीय केंद्र, इग्नू