शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

आता राज्यभर धावणार एसटीच्या एसी व्होल्वो बस

By admin | Updated: March 3, 2016 04:31 IST

खासगी बसेसचा प्रवास एसटीपेक्षा आरामदायी असल्याने, प्रवाशांचा ओढा खासगी बसेसकडे असतो. त्यामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे

मुंबई: खासगी बसेसचा प्रवास एसटीपेक्षा आरामदायी असल्याने, प्रवाशांचा ओढा खासगी बसेसकडे असतो. त्यामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. उच्च न्यायालयाने वारंवार बजावल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यभर एसी बसेस आणि स्लीपर कोच सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी बुधवारी उच्च न्यायालयाला दिली.एसटीच्या वेगवेगळ्या विभागांकडे एस. टी. महामंडळाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे एसटीने विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू व अन्य जणांना सलवत देण्याचे बंद करू, असा इशारा सरकारला दिला. याची गांभीर्याने दखल घेत, व्यवसायाने वकील असलेले दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेची व्याप्ती वाढवत उच्च न्यायालयाने एसटीचे नुकसान नक्की कोणामुळे आणि कशामुळे होते? अशी विचारणा महामंडळाकडे केली. त्यावर महामंडळाने यास मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस जबाबदार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारला एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना फिरू देऊ नका, तसेच नियम मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने सरकारला दिले. खासगी बसेसप्रमाणे एसटीनेही प्रवाशांना आरामदायी सुविधा द्यावी, अशी सूचना सरकारला केली होती.त्यानुसार, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सरकारने आसनी एसी, स्लीपर कोच यासारख्या बसेस, राज्यातील सर्व मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी वाहतूक करणाऱ्यांवर नजर राहील. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचेही अ‍ॅड. वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने ही सर्व माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश सरकारला देत, या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली. (प्रतिनिधी) > ‘आरामदायी प्रवासासाठी सरकारने सेमी स्लीपरसारख्या बसेस विकत घेण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली आहे. आता या बसेस केवळ मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक इत्यादी मार्गांपुरत्या मर्यादित न राहता, सर्व राज्यभर धावतील,’ अशी माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली.