शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आता जबाबदारी कोल्हापूरकरांची...महालक्ष्मीचा इतिहास बदलतोय ! भाग - ५

By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST

भाविकांना जाग : चुकीचा प्रसार थांबविण्याच्या मालिकेसाठी ‘लोकमत’चे अभिनंदन---महालक्ष्मी की अंबाबाई..

इंदुमती गणेश- कोल्हापूर -ज्या देवीचे दर्शन घेतल्याशिवाय कोल्हापूरकरांचा दिवस सुरू होत नाही, त्या देवीचे खरे माहात्म्य परस्थ भाविकांपर्यंत पोहोचविणे व मराठमोळ््या कोल्हापूरचे दाक्षिणात्यीकरण थांबविणे ही जबाबदारी प्रत्येक कोल्हापूरवासीयांची आहे. प्राचीन शिलालेख, धार्मिक ग्रंथ, पुराभिलेखागारमधील कागदपत्रे, इतिहास संशोधकांनी केलेला अभ्यास यांपैकी कोणत्याही ग्रंथांत अंबाबाईला तिरूपती देवस्थानशी जोडण्यात आलेले नाही. या मालिकेमुळे देवीचा खरा इतिहास पुन्हा प्रकाशात आला याबद्दल वाचक, जाणकार, मंदिर अभ्यासक, इतिहास संशोधकांसह नागरिक ‘लोकमत’चे अभिनंदन करीत आहेत. भारत ही देवदेवतांची भूमी आहे. त्यायोगे श्रद्धेय भावनेतून एका देवस्थानने दुसऱ्या देवस्थानला किंवा शक्तिपीठाला महावस्त्र (शालू) पाठविणे ही पद्धत फार जुनी आहे. फक्त त्याला चुकीच्या धार्मिक संबंधांनी जोडले गेले की, त्या स्थानाचा मूळ इतिहास पुसला जाण्याचा धोका असतो, अंबाबाईबाबतही सध्या हेच घडत आहे. विष्णूने आई म्हणून ज्या देवतेची उपासना केली, तिचा पत्नी म्हणून होणारा प्रसार आताच नाही थांबविला तर भविष्यात ते कधीच शक्य होणार नाही. ही मालिका प्रसिद्ध करून देवीचा खरा इतिहास पुन्हा प्रकाशात आणल्याबद्दल नागरिकांनी ‘लोकमत’चे विशेष आभार मानले. गेली कित्येक वर्षे आम्ही ही गोष्ट पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो; पण आता पुराव्यांनिशी ती प्रकाशात आली. या देवीचा खरा इतिहास समजला, आता तरी चुकीचा प्रचार थांबेल, अशा शब्दांत नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. शुभम शिरहट्टी या शालेय विद्यार्थ्यापासून श्रीपूजक, देवस्थान समितीचे सदस्य, मूर्ती व मंदिर अभ्यासक, इतिहास संशोधक, जादूगार गुरुनाथ, उजळाईवाडीचे सुनील माने, सांगलीचे बाळासाहेब लोखंडे, सदानंद पेटकर, प्रताप नाईक यांच्यासह महिला, तसेच नागरिकांनी दूरध्वनी व पत्रांद्वारे अभिनंदन केले. (क्रमश:)महालक्ष्मी की अंबाबाई..ज्या आदिशक्तीने अन्य देवतांची निर्मिती केली, ती देवता म्हणजे ‘महालक्ष्मी’. या शक्तीने असुरांचा संहार केला म्हणून ती जगदंबा किंवा अंबाबाई. कोल्हापूरवासीयांनी, छत्रपतींनी देवीला अंबाबाई रूपातच पूजले म्हणून आजही या देवीला महालक्ष्मी नाही तर अंबाबाईच म्हणतात. मंदिरावरदेखील ‘अंबाबाई मंदिर’ अशीच पाटी आहे. संदर्भ सूची...कोल्हापूरच्या या देवीचे खरे स्वरूप मंदिरातील प्राचीन शिलालेखा, ताम्रपटातूनदेखील प्रकट होते. या मालिकेसाठी ‘दुर्गासप्तशती’, ‘करवीर माहात्म्य’ या प्रमाण ग्रंथांबरोबरच इतिहास संकलन समितीने प्रकाशित केलेल्या ‘युगयुगीन करवीर दर्शन’ या ग्रंथाचा संदर्भ घेण्यात आला. डॉ. सुभाष देसाई यांनी ‘महालक्ष्मी की अंबाबाई’ या पुस्तकात या देवीचे महालक्ष्मीकरण कसे झाले हे रोखठोकपणे मांडले आहे. वा. रा. धर्माधिकारी लिखित ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी’, सुहास जोशी यांच्या ‘करवीरनिवासिनी माहात्म्य’, पुराभिलेखागार कार्यालयातील जुने दस्तावेज, छत्रपती घराण्याची कागदपत्रे या सगळ््यांत देवीचे माहात्म्य मांडले आहे. मात्र, यांपैकी एकाही ग्रंथात किंवा शिलालेखांत तिरूपती बालाजीचा उल्लेख नाही. फक्त तिरूमला विद्यापीठाच्या वेंकटाचल माहात्म्य व तिरूपती देवस्थानच्या ‘तिरूचानुरू श्री क्षेत्र महिमा’ या तेलगू ग्रंथात विष्णूने लक्ष्मीच्या पुनर्प्राप्तीसाठी अंबाबाईची आराधना केल्याचा उल्लेख आहे. महत्त्व अबाधित राहीलकाहीजण असाही युक्तिवाद करतात की, यामुळे कोल्हापूरचा विकास होणार असेल तर काय हरकत आहे?...पण, ते हे लक्षात घेत नाहीत की, तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराचा विकास करण्यासाठी तिरूपतीचा आधार कशाला घ्यायला हवा? कारण देवीचे धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. शिवाय कोल्हापूरची मराठमोळी संस्कृती, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, राजर्षी शाहू महाराज आणि ऐतिहासिक वारसा याच्या जोरावर एक तीर्थक्षेत्र, त्याचबरोबर पर्यटन केंद्र म्हणून विकास करता येऊ शकतो. लोकप्रतिनिधी, देवस्थान समिती आणि अन्य संबंधितांनी याचा विचार करून या मंदिराचे दाक्षिणात्यीकरण थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तरच साडेतीन शक्तिपीठांमधील एक असलेल्या आद्यशक्ती महालक्ष्मीचे महत्त्व अबाधित राहील.