शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

आता खासगी डॉक्टरसमोरीलही मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 04:54 IST

आत्महत्येच्या घटनांमध्ये अत्यवस्थ व गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांना आता सरकारी डॉक्टराप्रमाणेच खासगी डॉक्टरांसमोर घेता येणार

जमीर काझी,

मुंबई- घातपात, मारामारी किंवा आत्महत्येच्या घटनांमध्ये अत्यवस्थ व गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीचा मृत्यूपूर्व जबाब पोलिसांना आता सरकारी डॉक्टराप्रमाणेच खासगी डॉक्टरांसमोर घेता येणार आहे. त्यासाठी विशेष दंडाधिकारी (स्पेशल मॅजिस्ट्रेट) किंवा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करत तिष्ठत बसावे लागणार नाही. सरकारी व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या साक्षीने जबाब नोंदविण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस व वैद्यकीय रुग्णालयांना नुकतेच दिले आहेत. एखादी दुर्घटना, मारामारी किंवा आत्महत्येचा प्रयत्न आदी घटनांमध्ये पीडित असलेल्या व्यक्तींना अनेकवेळा अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले जाते. त्यावेळी संबंधित हद्दीचे पोलीसही उपस्थित असतात. मात्र जखमी, पीडित व्यक्तीकडून घडलेल्या घटनेची माहिती, त्याचा जबाब घेण्यासाठी त्यांना त्या परिसरातील विशेष दंडाधिकारी, किंवा सरकारी डॉक्टरांची उपस्थिती असणे अनिवार्य होते. त्याशिवाय पीडिताचा जबाब ग्राह्य धरला जात नसे. त्यामुळे अनेकवेळा संबंधित मॅजेस्ट्रेट अन्य कामामध्ये व्यस्त असल्याने तात्काळ उपलब्ध न झाल्यास पंचाईत होत होती. तसेच जखमी व्यक्तीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्यास त्याला तेथून सरकारी रुग्णालयात नेणे क्रमप्राप्त ठरत होते. त्यात उशीर झाल्यास अनेकदा संबंधित जखमी व्यक्ती दगावत असल्याचाही घटना होत. उच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी पीडित जिवंत असेपर्यंत मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र त्यात मॅजेस्ट्रेट व सरकारी डॉक्टरांची अनुपलब्धता असल्याचे नमूद करण्यात आल्यानंतर मृत्यूपूर्व जबाब हा खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितही घेतला जावू शकतो, आणि तो ग्राह्य धरला जावा अशी सूचना केली. >पोलिसांचा ससेमिरा आणि पेशंट : मारामारी किंवा अन्य घटनांमध्ये गंभीर झालेल्या व्यक्तीला प्रामुख्याने जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला दाखल केले जाते. तेथे पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये, यासाठी पेंशटला सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र त्यात वेळ जाऊन पेशंट दगावण्याची शक्यता असते. तथापि, या निर्णयामुळे पोलीस, संबंधित जखमी व त्यांच्या नातेवाईकांचा त्रास कमी होईल, तसेच आरोपींचा शोध तातडीने घेता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.