शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलीस दलात झीरो टॉलरन्स

By admin | Updated: December 13, 2014 02:39 IST

कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व प्रकारच्या गुन्हेगारीबाबत ‘झीरो टॉलरन्स’ ठेवण्यात येईल.

बेशिस्त आणणा:या अधिका:यांवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नागपूर, : कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व प्रकारच्या गुन्हेगारीबाबत ‘झीरो टॉलरन्स’ ठेवण्यात येईल. पोलीस दलात बेशिस्त आणि वरिष्ठांचा अनादर करणा:या अधिका:यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. त्याचवेळी महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष उभारला जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
नियम 293 अन्वये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. आ. विजय वडेट्टीवार यांनी ही चर्चा उपस्थित केली होती. मागच्या सरकारने पोलीस खाते कशापद्धतीने चालवले याचे अनेक दाखले देत त्यावर टीका करीत फडणवीस यांनी पोलीस दलाचे आकर्षक चित्र विधानसभेत उभे केले. (प्रतिनिधी)
 
4अपराध सिद्धीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रोसिक्युटरचे पॅनेल करणार.
 
 4नांदेड आणि कोल्हापूर येथे नवीन फॉरेन्सिक लॅब मंजूर. 
 
4चौकशीदरम्यान योग्य कायदेशीर मदत दिली जाईल.
 
 4चौकशी अधिका:यास पारितोषिके देणार.
 
4चौकशीदरम्यान योग्य कायदेशीर मदत दिली जाईल.
 
 4पोलिसांशी संबंधित परवान्यांसाठी सिंगल विंडो सिस्टिम.
 
4आर्थिक गुन्ह्यांच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करणार.
 
4गुन्हे शाबितीचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचा:यींस विशेष पुरस्कार.
 
4प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयात फॉरेन्सिक युनिट्स निर्माण करणार.
 
4जिल्हा पोलीस अधीक्षकांना विशेष प्रकरणांमध्ये राज्य शासनाच्या पॅनेलवरील स्पेशल प्रोसिक्युटर नियुक्त करण्याचे अधिकार देण्याचा विचार.
 
4सायबर गुन्हेगारीसंदर्भात कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज. 
 
पोलिसांसाठी पुरेशा प्रमाणात घरे
पोलिसांसाठी पुरेशा प्रमाणात घरे उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस गृहनिर्माण योजनांची फाईल गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होती. यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला असून या घरांना वाढीव एफएसआय मिळणार असून म्हाडा आणि खाजगी कंपन्यांच्या भागीदारीत पोलिसांसाठी मोठय़ा प्रमाणावर घरे उपलब्ध करून दिली जातील.
 
बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण
पोलिसांच्या बदल्या तसेच इतर अधिकारांचे विकेंद्रीकरण करून खालच्या स्तरार्पयत दिले जातील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या दर दोन वर्षांनी पोलीस शिपायांची बदली करण्यात येते.  मात्र, हा कालावधी आता पाच वर्षे करण्यात येईल. 
 
दहशतवादविरोधी धोरण निश्चित करणार
दोन वर्षांपूर्वी पुणो येथील बॉम्बस्फोटानंतर दहशतवादविरोधी धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यावर पुढे काहीही कार्यवाही झाली नाही. हे धोरण निश्चित करण्यात येईल.