शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

...आता नाशिक शेतकरी संपाचे केंद्र : कर्जमुक्तीशिवाय माघार नाही

By admin | Updated: June 3, 2017 14:37 IST

नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संपाप व्यक्त होत आहे असून नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरुच ठेवत यापुढे संपाची सूत्र नाशिकमधून हालविण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाचे आतापर्यंत केंद्र ठरलेल्या पुणतांबा येथील किसान क्रांती मोर्चाच्या कोर कमिटीतील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली. त्यावर नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संपाप व्यक्त होत आहे असून नाशिकच्या शेतकऱ्यांनी यापुढेही संप सुरुच ठेवत यापुढे संपाची सूत्र नाशिकमधून हालविण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील शेतकरी संपाचे नाशिकच मुुख्य केंद्र बनणार आहे. मुंख्यमंत्र्यांसमवेत बैठकीला उपस्थित असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. असा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा सवाल उपस्थित करीत सूयर्वंशी सरकारला फितूर झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही नेत्यावर अथवा शेतकऱ्यांवर आरोप न करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषण देत सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. तत्पुर्वी मुंबईतून संप मागे घेण्याची घोषणा झाल्याने नाशिकचा सुरू ठेवत पुढील दिशा ठरविण्यासाठी शेतकरी बाजार समिती परिसरात दाखल झाले.

 

यावेळी एका व्यापाऱ्याने त्याचे दुकान सुरू करण्याता प्रयत्न केला. त्याला शेतकऱ्यांनी विनंतीकरून दुकान बंद करण्याचे आवाहन केले. मात्र संप मागे घेतला असून मी माल पैसे देऊन खरेदी केला असल्याचे सांगत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची व्यापाऱ्याचा माल फेकण्यास सुरुवात केल्याने व्यापारी विरोधात शेतकरी असा संघर्ष निर्माण झाल्याने बाजारसमिती आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी बैठकीला सुरुवात करून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमालाला हमी भाव व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते हंसराज वडघुले, गिरीधर जाधव, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, आमदार जे.पी. गावित, किसान सभेचे राजू देसले आदिंनी शेतकरी संपाविषयी भूमिका स्पष्ट करताना नाशिक जिल्हासह राज्यभरात संप सुरुच ठेवण्याच्या शेतकऱ्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.