शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

आता खासदारांचा कस

By admin | Updated: May 17, 2014 23:59 IST

झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.

मुंबई : मोनोचा दुसरा टप्पा अपूर्ण, धारावीचा रखडेला पुनर्विकास, ईस्टर्न फ्री वे, सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, चेंबूर-माहूल परिसरातील प्रदूषण झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास आणि झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.
वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा येथे पिण्याचे पाणी, सांडपाणी, सेसप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास या प्रमुख समस्या आहेत. माहीम, धारावी, वडाळा, सायन, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथील झोपडय़ांमधील प्रश्न गंभीर आहेत. सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा रखडलेला पुनर्विकास आणि जुन्या वसाहतींचा पुर्नविकास, असे अनेक प्रश्न येथे आहेत.
दक्षिण मुंबईत सुमारे शंभर वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून सुटलेला नाही. चेंबूर, माहूल परिसरातील खासगी कंपन्यांमधून बाहेर पडणा:या प्रदूषित पाणी आणि वायूमुळे येथे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मालाड आणि मालवणी येथे कारखाने असून, येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. पश्चिम उपनगरांतील मोकळ्या भूखंडावर भूमाफियांचा डोळा आहे. परिणामी ते संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अंधेरी, विलेपार्ले, कलिना आणि कुर्ला येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रस्ता रुंदीकरणातंर्गत येथील प्रकल्प सुरू झालेले नाहीत. मालाड आणि मालवणी येथील पायाभूत सेवासुविधांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 5क् लाखांवर वस्ती असलेल्या पश्चिम उपनगरांत पुरेशी खासगी आणि सरकारी रुग्णालये नाहीत.
चारकोप, मालाड आणि मालवणी येथील तिवरांचे कत्तलीचे प्रमाण वाढते आहे. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. परिणामी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळला आहे. गोरेगाव, बोरीवली आणि कांदिवली येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील रेल्वे स्थानकांवरील लोकलची संख्या वाढविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
 
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो रेल्वे मार्ग पूर्ण झालेला नाही. शिवाय मेट्रो प्रकल्पांतर्गत जे रहिवासी बाधित झाले आहेत त्यांना अद्याप दिलासा देण्यात आलेला नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या झोपडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून चिघळला आहे. वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर आणि भारत नगर येथील झोपडय़ा वाढतच आहेत.