शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आता खासदारांचा कस

By admin | Updated: May 17, 2014 23:59 IST

झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.

मुंबई : मोनोचा दुसरा टप्पा अपूर्ण, धारावीचा रखडेला पुनर्विकास, ईस्टर्न फ्री वे, सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, चेंबूर-माहूल परिसरातील प्रदूषण झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास आणि झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.
वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा येथे पिण्याचे पाणी, सांडपाणी, सेसप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास या प्रमुख समस्या आहेत. माहीम, धारावी, वडाळा, सायन, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथील झोपडय़ांमधील प्रश्न गंभीर आहेत. सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा रखडलेला पुनर्विकास आणि जुन्या वसाहतींचा पुर्नविकास, असे अनेक प्रश्न येथे आहेत.
दक्षिण मुंबईत सुमारे शंभर वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून सुटलेला नाही. चेंबूर, माहूल परिसरातील खासगी कंपन्यांमधून बाहेर पडणा:या प्रदूषित पाणी आणि वायूमुळे येथे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मालाड आणि मालवणी येथे कारखाने असून, येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. पश्चिम उपनगरांतील मोकळ्या भूखंडावर भूमाफियांचा डोळा आहे. परिणामी ते संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अंधेरी, विलेपार्ले, कलिना आणि कुर्ला येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रस्ता रुंदीकरणातंर्गत येथील प्रकल्प सुरू झालेले नाहीत. मालाड आणि मालवणी येथील पायाभूत सेवासुविधांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 5क् लाखांवर वस्ती असलेल्या पश्चिम उपनगरांत पुरेशी खासगी आणि सरकारी रुग्णालये नाहीत.
चारकोप, मालाड आणि मालवणी येथील तिवरांचे कत्तलीचे प्रमाण वाढते आहे. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. परिणामी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळला आहे. गोरेगाव, बोरीवली आणि कांदिवली येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील रेल्वे स्थानकांवरील लोकलची संख्या वाढविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
 
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो रेल्वे मार्ग पूर्ण झालेला नाही. शिवाय मेट्रो प्रकल्पांतर्गत जे रहिवासी बाधित झाले आहेत त्यांना अद्याप दिलासा देण्यात आलेला नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या झोपडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून चिघळला आहे. वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर आणि भारत नगर येथील झोपडय़ा वाढतच आहेत.