शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

आता खासदारांचा कस

By admin | Updated: May 17, 2014 23:59 IST

झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.

मुंबई : मोनोचा दुसरा टप्पा अपूर्ण, धारावीचा रखडेला पुनर्विकास, ईस्टर्न फ्री वे, सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, चेंबूर-माहूल परिसरातील प्रदूषण झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास आणि झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.
वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा येथे पिण्याचे पाणी, सांडपाणी, सेसप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास या प्रमुख समस्या आहेत. माहीम, धारावी, वडाळा, सायन, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथील झोपडय़ांमधील प्रश्न गंभीर आहेत. सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा रखडलेला पुनर्विकास आणि जुन्या वसाहतींचा पुर्नविकास, असे अनेक प्रश्न येथे आहेत.
दक्षिण मुंबईत सुमारे शंभर वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून सुटलेला नाही. चेंबूर, माहूल परिसरातील खासगी कंपन्यांमधून बाहेर पडणा:या प्रदूषित पाणी आणि वायूमुळे येथे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मालाड आणि मालवणी येथे कारखाने असून, येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. पश्चिम उपनगरांतील मोकळ्या भूखंडावर भूमाफियांचा डोळा आहे. परिणामी ते संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अंधेरी, विलेपार्ले, कलिना आणि कुर्ला येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रस्ता रुंदीकरणातंर्गत येथील प्रकल्प सुरू झालेले नाहीत. मालाड आणि मालवणी येथील पायाभूत सेवासुविधांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 5क् लाखांवर वस्ती असलेल्या पश्चिम उपनगरांत पुरेशी खासगी आणि सरकारी रुग्णालये नाहीत.
चारकोप, मालाड आणि मालवणी येथील तिवरांचे कत्तलीचे प्रमाण वाढते आहे. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. परिणामी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळला आहे. गोरेगाव, बोरीवली आणि कांदिवली येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील रेल्वे स्थानकांवरील लोकलची संख्या वाढविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
 
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो रेल्वे मार्ग पूर्ण झालेला नाही. शिवाय मेट्रो प्रकल्पांतर्गत जे रहिवासी बाधित झाले आहेत त्यांना अद्याप दिलासा देण्यात आलेला नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या झोपडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून चिघळला आहे. वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर आणि भारत नगर येथील झोपडय़ा वाढतच आहेत.