शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

आता खासदारांचा कस

By admin | Updated: May 17, 2014 23:59 IST

झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.

मुंबई : मोनोचा दुसरा टप्पा अपूर्ण, धारावीचा रखडेला पुनर्विकास, ईस्टर्न फ्री वे, सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, चेंबूर-माहूल परिसरातील प्रदूषण झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास आणि झोपडीधारकांचे पुनर्वसन, असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांसमोर असून, त्यांचा आता कस लागणार आहे.
वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा येथे पिण्याचे पाणी, सांडपाणी, सेसप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास या प्रमुख समस्या आहेत. माहीम, धारावी, वडाळा, सायन, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथील झोपडय़ांमधील प्रश्न गंभीर आहेत. सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा रखडलेला पुनर्विकास आणि जुन्या वसाहतींचा पुर्नविकास, असे अनेक प्रश्न येथे आहेत.
दक्षिण मुंबईत सुमारे शंभर वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सेस प्राप्त इमारतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षापासून सुटलेला नाही. चेंबूर, माहूल परिसरातील खासगी कंपन्यांमधून बाहेर पडणा:या प्रदूषित पाणी आणि वायूमुळे येथे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मालाड आणि मालवणी येथे कारखाने असून, येथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. पश्चिम उपनगरांतील मोकळ्या भूखंडावर भूमाफियांचा डोळा आहे. परिणामी ते संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अंधेरी, विलेपार्ले, कलिना आणि कुर्ला येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रस्ता रुंदीकरणातंर्गत येथील प्रकल्प सुरू झालेले नाहीत. मालाड आणि मालवणी येथील पायाभूत सेवासुविधांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 5क् लाखांवर वस्ती असलेल्या पश्चिम उपनगरांत पुरेशी खासगी आणि सरकारी रुग्णालये नाहीत.
चारकोप, मालाड आणि मालवणी येथील तिवरांचे कत्तलीचे प्रमाण वाढते आहे. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षक भिंतीचा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. परिणामी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रेंगाळला आहे. गोरेगाव, बोरीवली आणि कांदिवली येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील रेल्वे स्थानकांवरील लोकलची संख्या वाढविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
 
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो रेल्वे मार्ग पूर्ण झालेला नाही. शिवाय मेट्रो प्रकल्पांतर्गत जे रहिवासी बाधित झाले आहेत त्यांना अद्याप दिलासा देण्यात आलेला नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या झोपडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून चिघळला आहे. वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर आणि भारत नगर येथील झोपडय़ा वाढतच आहेत.