शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मंत्र्यांप्रमाणेच आता सचिवदेखील फिरणार

By admin | Updated: November 7, 2015 03:01 IST

राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे

मुंबई : राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे. सर्व विभागांचे सचिव आठवड्यातून दोन दिवस दौऱ्यावर राहतील, असा आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज काढला.एरवी मंत्री दौरे करतात आणि सचिव मुख्यत्वे मंत्रालयात बसून असतात. मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची जबाबदारी काही सचिवांकडे सोपविली होती. पालक सचिव ही जुनी संकल्पना प्रशासनात आहेच, पण पालकमंत्री फिरतात त्याच्या १० ते २० टक्केही पालक सचिव संबंधित जिल्ह्याचा दौरा करत नाहीत, असा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशात, विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव या सर्वांनाच मंत्रालयाच्या वातानुकूलित कक्षातून बाहेर काढून राज्यभर दौऱ्यांवर पाठविण्याची भूमिका घेतली आहे. सर्व सचिवांनी ग्रामीण भागांत मुक्काम करून सामान्यांशी संवाद साधावा व त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे मुख्य सचिवांनी आदेशात म्हटले आहे. राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. त्यांची गावपातळीपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणे गरजेचे आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेणे, सामान्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हे दौरे आवश्यक असल्याचे फर्मान मुख्य सचिवांनी काढले आहे. (विशेष प्रतिनिधी)क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागणारपूर्वी वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन सखोल तपासणी करत. तीच पद्धत अवलंबण्यात येईल. भेटीदरम्यान समोर आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी ते मार्गदर्शन करतील. मुख्य सचिव सचिवांनी केलेल्या कामाची नोंद मूल्यमापन अहवालात करतील. मुख्य सचिवही दौरा करणारमुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय स्वत:देखील राज्याचा दौरा करणार आहेत. लोकोपयोगी योजनांचा आढावा ते या भेटीत घेणार आहेत.