शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

मंत्र्यांप्रमाणेच आता सचिवदेखील फिरणार

By admin | Updated: November 7, 2015 03:01 IST

राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे

मुंबई : राज्यकारभार चांगला चालविण्यासाठी प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळे आता प्रशासनात हालचाल सुरू झाली आहे. सर्व विभागांचे सचिव आठवड्यातून दोन दिवस दौऱ्यावर राहतील, असा आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज काढला.एरवी मंत्री दौरे करतात आणि सचिव मुख्यत्वे मंत्रालयात बसून असतात. मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची जबाबदारी काही सचिवांकडे सोपविली होती. पालक सचिव ही जुनी संकल्पना प्रशासनात आहेच, पण पालकमंत्री फिरतात त्याच्या १० ते २० टक्केही पालक सचिव संबंधित जिल्ह्याचा दौरा करत नाहीत, असा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशात, विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव या सर्वांनाच मंत्रालयाच्या वातानुकूलित कक्षातून बाहेर काढून राज्यभर दौऱ्यांवर पाठविण्याची भूमिका घेतली आहे. सर्व सचिवांनी ग्रामीण भागांत मुक्काम करून सामान्यांशी संवाद साधावा व त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे मुख्य सचिवांनी आदेशात म्हटले आहे. राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. त्यांची गावपातळीपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणे गरजेचे आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेणे, सामान्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हे दौरे आवश्यक असल्याचे फर्मान मुख्य सचिवांनी काढले आहे. (विशेष प्रतिनिधी)क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागणारपूर्वी वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन सखोल तपासणी करत. तीच पद्धत अवलंबण्यात येईल. भेटीदरम्यान समोर आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी ते मार्गदर्शन करतील. मुख्य सचिव सचिवांनी केलेल्या कामाची नोंद मूल्यमापन अहवालात करतील. मुख्य सचिवही दौरा करणारमुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय स्वत:देखील राज्याचा दौरा करणार आहेत. लोकोपयोगी योजनांचा आढावा ते या भेटीत घेणार आहेत.