शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘आता चुकाल, तर वर्षाला मुकाल!’

By admin | Updated: September 24, 2016 01:46 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या शेवटच्या यादीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या शेवटच्या यादीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यानंतर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची राहणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.याआधी अकरावी प्रवेशाच्या तब्बल १० प्रवेश याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे महाविद्यालय सुरू झाले असून परीक्षा तोंडावर आहेत. दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने दहावी प्रवेश यादी जाहीर केली. या वेळी एकूण ६ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ५६४ विद्यार्थ्यांना प्रवेश घोषित झाले, तर ३२ विद्यार्थ्यांना एकाही महाविद्यालयात प्रवेश देता आला नाही. प्रवेश घोषित झालेल्या ६ हजार ५६४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ४९१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. त्यामुळे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधील २०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही.परिणामी आतापर्यंत कुठेही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून २६ सप्टेंबरपासून अकरावी प्रवेश यादीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. २६ व २७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित करून महाविद्यालय पसंतीक्रम अर्ज भरायचे आहे. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, तर २९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)