शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

बांधकामांसोबत दर्जावरही महारेराची आता करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 05:59 IST

ग्राहकांना दिलासा : गुणवत्ता हमी प्रमाणपत्र विकासकांना बंधनकारक

मुंबई : विकासकांकडून घर घेणाऱ्या ग्राहकांची कोणत्या प्रकारची लूट किंवा फसवणूक होऊ नये, यासाठी महारेराची निर्मिती करण्यात आली होती. त्याप्रमाणे, विकासकांनी आपला कुठलाही गृहप्रकल्प तयार करण्यापूर्वी त्याची नोंदणी करणे महारेराकडे बंधनकारक असते.

मात्र, आता कोणत्याही गृहप्रकल्पाच्या बांधकामावरही महारेराची करडी नजर असणार आहे. कारण यापुढे गृहप्रकल्प उभारताना वापरल्या जाणाºया बांधकाम साहित्याचा दर्जा योग्य आहे का? यासंबंधीचे गुणवत्ता हमी प्रमाणपत्रही प्रत्येक विकासकाने सादर करणे महारेराने बंधनकारक केले आहे. याबाबतचे परिपत्रक महारेराने नुकतेच जाहीर केले. हक्काचे घर घेणाºया ग्राहकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

विकासक खूप वेळा दिलेल्या वेळेत घराचा ताबा देत नाहीत. आधी सांगितल्याप्रमाणे ज्या सोईसुविधा गृहप्रकल्प घेताना दाखविल्या जातात, त्या सोईसुविधा त्या दर्जाप्रमाणे नंतर ग्राहकांना मिळत नाहीत. विकासक दिलेल्या आराखड्यानुसार आपल्या गृहप्रकल्पाचे बांधकाम करत नाहीत. करार करताना कागदावर दाखविण्यात आलेले क्षेत्रफळ आणि गृहप्रकल्प उभारल्यानंतरचे क्षेत्रफळ यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. या सर्व गोष्टींमुळे विकासकांकडून ग्राहकांची अनेकदा फसवणूक होते. त्याचबरोबर, गृहप्रकल्प उभारताना बांधकाम साहित्यातही निकृष्ट दर्जाचा माल वापरल्याने भिंतींना भेगा पडणे, घरात पाण्याची गळती होणे, स्लॅब कोसळणे, फरशांना भेगा पडणे अशा गोष्टी घडत असतात. या संदर्भातील अनेक तक्रारी ग्राहकांमार्फत महारेराकडे आल्या.

याचा विचार करूनच महारेराने विकासकांविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. यापुढे विकासकांना आपल्या गृहप्रकल्पाची नोंदणी केल्यावर बांधकाम साहित्याच्या दर्जाबद्दल महारेराला विस्तृत माहिती द्यायची आहे. गृहप्रकल्प उभारताना वापरल्या जाणाºया बांधकाम साहित्याच्या दर्जाबाबतचे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र प्रत्येक विकासकाने महारेराला सादर करणे बंधनकारक केले आहे.फसवणुकीला आळा बसणारमहारेराच नवीन निर्णयानुसार, बांधकामात वापरल्या जाणाºया सिमेंट, रेती, लोखंड आणि इतर साहित्यांचा किती प्रमाणात वापर केला, याची नोंद करणारे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र यापुढे विकासकांना सादर करावे लागणार आहे. त्यामुळे आता विकासकांना आपला गृहप्रकल्प उभारताना बांधकाम साहित्याच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावे लागेल. शिवाय यामुळे ग्राहाकांच्या होणाºया फसवणुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.