शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

...आता घरठाण हक्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 05:51 IST

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांचा समावेश सांविधानिक हक्कात केला आहे.

अलिबाग : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांचा समावेश सांविधानिक हक्कात केला आहे. असे असले तरीही निवारा हक्क प्रत्यक्षात उपभोगायला मिळणे यासाठी दलित, आदिवासी, शेतमजुरांना संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्र राज्य हे जमीन हक्कांच्या कायद्यांबाबत पुरोगामी असले तरीही कूळ कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सातत्याने ‘राहील त्याचे घर’ या तरतुदीसाठी संघर्ष करावा लागतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केले आहे. आदिवासी क्षेत्रात कार्यरत अंकुर ट्रस्ट व लोकमंच या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पेण येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात पाटील बोलत होत्या. पाटील म्हणाल्या की,‘राहील त्याचे घर, अन् कसेल त्याची जमीन’ हे कूळ कायद्याचे ब्रीद वाक्य आहे. राहील त्याच्या घरासाठी कूळ कायदा कलम १७ ब २ अन्वये यापूर्वी २९ मे २००० ला अधिसूचना निघाली होती. याचा आधार घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रा.वि.भुस्कटे यांच्या मार्गदर्शनाखालील अंकुर ट्रस्ट या संस्थेने ग्रामस्तरावर भरीव कार्य केले आहे. यानुसार महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रथम दर्गावाडी येथील महिलांना ८ मार्च २००५ रोजी घरठाणाचे पहिले ७-१२ उतारे करण्यात आले. घरठाण दावे दाखल करण्यासंदर्भात अधिक माहिती व मार्गदर्शनाकरिता संघटनेशी संपर्क करावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केले आहे. (विशेष प्रतिनिधी)