शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

...आता तरी द्या दररोज पाणी

By admin | Updated: August 4, 2016 00:50 IST

शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला.

पुणे : पुणेकरांचा अजून अंत पाहू नका, सर्व धरणांमध्ये आता समाधानकारक पाणीसाठा आहे, त्यामुळे शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला. आयुक्तांच्या माध्यमातून हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांचा निर्णय काय होतो यावरच या ठरावाची अंमलबजावणी अवलंबून आहे.धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक नाही, असे कारण देत रोज पाणी देण्याला साधारण पंधरा दिवसांपूर्वी विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्ष, काँग्रेस यांचीही आता पाणी रोज देण्याला संमती होती. मात्र, तरीही यावरून सर्वसाधारण सभेत राजकीय चर्चेने रंग धरला. त्याचा निषेध करीत अखेरीस काँग्रेसने सभात्याग केला. सभेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी रोज पाणी देण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यांच्या सदस्यांनी पाण्यावर बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य केले. त्यावरून भाजपचे गटनेते गणेश बीडकर व त्यांची चकमक उडाली. राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांच्याबरोबर तर त्यांचे वाद झाले.मनसेच्या राजेंद्र वागसकर, बाळा शेडगे, रूपाली पाटील, अस्मिता शिंदे, सुशीला नेटके, पुष्पा कनोजिया, आदींनी पालकमंत्री बापट पाण्याच्या विषयात राजकारण आणत असल्याची टीका केली. वर्षभर दिवसाआड पाणी सहन करणाऱ्या पुणेकरांना आता पाणी असतानाही ते द्यावे असे बापट यांना वाटत नसल्याचा आरोप त्यांनी केला. हातातील फलक उंचावून त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. महापौरांनाही त्यांनी जबाबदार धरले. भाजपचे धनंजय जाधव, सेनेचे सचिन भगत, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, काँग्रेसच्या कमल व्यवहारे, सुनंदा गडाळे यांनीही चर्चेत भाग घेतला.राष्ट्रवादीच्या बंडू केमसे यांनी ‘महापौरांना काय विचारता, बापट यांनाच जाब विचारा’ असे सांगत मनसेच्या सदस्यांना डिवचले. बीडकर यांनी त्याला हरकत घेतली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप व त्यांची वादावादी झाली. अखेरीस महापौरांनी चर्चेत हस्तक्षेप केला.‘धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असल्याने आता पुणेकरांना रोज पाणी द्यावे’ अशी मागणी करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या ठरावानुसार जिल्हाधिकारी निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)।नदीपात्रातील वसाहतीकडे दुर्लक्षभाजपच्या मंजूषा नागपुरे, मनसेचे राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर यांनी नदीपात्रातील वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरले असूनही पालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका केली. नागपुरे यांनी एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने तिथे अद्याप भेट दिली नसल्याचे सांगितले. महापौरांनी त्यावर सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आयुक्तांसह आपण स्वत:ही लगेचच तिथे जाणार असल्याची माहिती दिली.>महापौरांना सर्वसाधारण सभा हँडल करता येत नाही, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. पाण्यासारख्या विषयावर नगरसेवक राजकीय स्वार्थ पाहत आहेत, अशी टीका करीत शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व सदस्यांसह सभात्याग केला. धरणात आता पाणीसाठा चांगला असल्याने रोज पाणी सोडण्यास काँग्रेसची हरकत नाही, असे त्यांनी सांगितले.>राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी हा विषय राजकीय स्वार्थ पाहण्याचा नाही असे सांगत स्वपक्षीय सदस्यांवरही टीका केली. सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुणेकरांना आता रोज पाणी दिलेच पाहिजे, अशी मागणी करण्याचे सुचविले.