शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...आता तरी द्या दररोज पाणी

By admin | Updated: August 4, 2016 00:50 IST

शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला.

पुणे : पुणेकरांचा अजून अंत पाहू नका, सर्व धरणांमध्ये आता समाधानकारक पाणीसाठा आहे, त्यामुळे शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला. आयुक्तांच्या माध्यमातून हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांचा निर्णय काय होतो यावरच या ठरावाची अंमलबजावणी अवलंबून आहे.धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक नाही, असे कारण देत रोज पाणी देण्याला साधारण पंधरा दिवसांपूर्वी विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्ष, काँग्रेस यांचीही आता पाणी रोज देण्याला संमती होती. मात्र, तरीही यावरून सर्वसाधारण सभेत राजकीय चर्चेने रंग धरला. त्याचा निषेध करीत अखेरीस काँग्रेसने सभात्याग केला. सभेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी रोज पाणी देण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यांच्या सदस्यांनी पाण्यावर बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य केले. त्यावरून भाजपचे गटनेते गणेश बीडकर व त्यांची चकमक उडाली. राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांच्याबरोबर तर त्यांचे वाद झाले.मनसेच्या राजेंद्र वागसकर, बाळा शेडगे, रूपाली पाटील, अस्मिता शिंदे, सुशीला नेटके, पुष्पा कनोजिया, आदींनी पालकमंत्री बापट पाण्याच्या विषयात राजकारण आणत असल्याची टीका केली. वर्षभर दिवसाआड पाणी सहन करणाऱ्या पुणेकरांना आता पाणी असतानाही ते द्यावे असे बापट यांना वाटत नसल्याचा आरोप त्यांनी केला. हातातील फलक उंचावून त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. महापौरांनाही त्यांनी जबाबदार धरले. भाजपचे धनंजय जाधव, सेनेचे सचिन भगत, राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, काँग्रेसच्या कमल व्यवहारे, सुनंदा गडाळे यांनीही चर्चेत भाग घेतला.राष्ट्रवादीच्या बंडू केमसे यांनी ‘महापौरांना काय विचारता, बापट यांनाच जाब विचारा’ असे सांगत मनसेच्या सदस्यांना डिवचले. बीडकर यांनी त्याला हरकत घेतली. त्यावर राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप व त्यांची वादावादी झाली. अखेरीस महापौरांनी चर्चेत हस्तक्षेप केला.‘धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असल्याने आता पुणेकरांना रोज पाणी द्यावे’ अशी मागणी करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या ठरावानुसार जिल्हाधिकारी निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)।नदीपात्रातील वसाहतीकडे दुर्लक्षभाजपच्या मंजूषा नागपुरे, मनसेचे राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर यांनी नदीपात्रातील वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरले असूनही पालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका केली. नागपुरे यांनी एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने तिथे अद्याप भेट दिली नसल्याचे सांगितले. महापौरांनी त्यावर सर्वसाधारण सभा संपल्यानंतर आयुक्तांसह आपण स्वत:ही लगेचच तिथे जाणार असल्याची माहिती दिली.>महापौरांना सर्वसाधारण सभा हँडल करता येत नाही, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. पाण्यासारख्या विषयावर नगरसेवक राजकीय स्वार्थ पाहत आहेत, अशी टीका करीत शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व सदस्यांसह सभात्याग केला. धरणात आता पाणीसाठा चांगला असल्याने रोज पाणी सोडण्यास काँग्रेसची हरकत नाही, असे त्यांनी सांगितले.>राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी हा विषय राजकीय स्वार्थ पाहण्याचा नाही असे सांगत स्वपक्षीय सदस्यांवरही टीका केली. सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुणेकरांना आता रोज पाणी दिलेच पाहिजे, अशी मागणी करण्याचे सुचविले.