शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

आता घाट सुनासुना

By admin | Updated: May 7, 2014 22:28 IST

आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील बैलगाडा शर्यत ही शेवटची शर्यत असल्याची भावना बैलगाडा मालकांमध्ये निर्माण झाली.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील बैलगाडा शर्यत ही शेवटची शर्यत असल्याची भावना बैलगाडा मालकांमध्ये निर्माण झाली. बुधवारी सकाळी शर्यत सुरू होतानाच न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त धडकले आणि बैलगाडा शौकिनांमध्ये खळबळ उडाली. आता असा सण पुन्हा पाहता येणार नाही, यापुढे अनेकांनी बैलगाडा डोळे भरून पाहून घेतले. सातगाव पठार भागातील कारेगाव येथील यात्रेने तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचा समारोप होतो. या वेळी या यात्रेला भावनिक किनार लाभली. मंगळवारी दोनशे बैलगाडे या यात्रेत सहभागी झाले. त्या वेळी शर्यतीवर बंदी येईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. शेतकर्‍यांनी बुधवारी होणार्‍या शर्यतीसाठी जय्यत तयारी केली व मात्र वाहनातून ते शर्यतीसाठी कारेगावला आले. सकाळी ११ वाजता शर्यतीचे उद्घाटन सुरू असताना वृत्तवाहिन्यांवर शर्यतीवरील बंदीचे वृत्त आले. घाटात ही बातमी समजणार कशी. त्या वेळी आढळराव पाटील बैलगाडा विमा योजनेचे अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी हा निर्णय ध्वनिक्षेप हातात घेऊन सांगितला. तेव्हा उपस्थित बैलगाडा मालकांना अक्षरश: झटका बसला. या अनपेक्षित बातमीने त्यांना काहीच सूचेनासे झाले. एरंडे यांनी या वेळी बैलगाडा मालकांना धीर देत यातून मार्ग काढू, अशी ग्वाही दिली. ही शेवटची शर्यत ठरणार असल्याने बैलगाडा मालकांनी धावणारे बैलगाडे अक्षरश: नजरेत साठवून ठेवले. सर्वच बैलगाड्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. मात्र, निसर्गाला ही शर्यत मान्य नसल्यासारखे वातावरण होऊन पाऊस झाला. पन्नास बैलगाडे घाटातून धावल्यानंतर पावसाने शर्यत बंद करावी लागली. ही आपली शेवटची बैलगाडा शर्यत असावी, अशी चर्चा बैलगाडा मालक गटागटाने करीत होते. ४चाकण : गाडामालक व बैलगाडा शौकिनांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा चाकण येथे तीन लाख रुपये खर्च करून नवीन घाट तयार करण्यात आला होता. बौद्ध पौर्णिमेला भैरवनाथमहाराजांची होणारी यात्रा नवीन घाटाच्या रूपाने चांगलीच गाजाणार असल्याचे संकेत मिळू लागले होते पण आता हा घाट शर्यत बंदीमुळे सूनासूनाच राहणार आहे. ४ग्रामीण भागातील गाडामालकांसह गाडा शौकिनांना गाड्यांच्या रूपाने घाटाचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी गोरे-पाटील परिवाराने पुढाकार घेऊन तब्बल तीन लाख रुपये खर्च करून आकर्षक असा नवीन घाट तयार करून घेतला. येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी सखाराम गोरे, ज्ञानेश्वर गोरे, शंकर गोरे व सुदाम गोरे या चार भावंडांनी या नवीन घाटासाठी जागा दिली. चाकण येथील रोहकल रस्त्यावर शेळी-मेंढी बाजार अर्थात खडीमशिनजवळ हा नवीन घाट तयार करण्यात आला. घाटातून पळणारा गाडा इतरत्र वळू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष व पोलीस पाटील वसंतराव गोरे व युवा नेते बाळासाहेब गायकवाड यांनी आवर्जून सांगितले. मात्र आता शर्यती होणार नसल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली.