शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
5
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
6
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
7
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
8
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
11
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
12
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
13
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
14
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
15
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
16
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
17
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
18
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
19
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू

आता घाट सुनासुना

By admin | Updated: May 7, 2014 22:28 IST

आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील बैलगाडा शर्यत ही शेवटची शर्यत असल्याची भावना बैलगाडा मालकांमध्ये निर्माण झाली.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील बैलगाडा शर्यत ही शेवटची शर्यत असल्याची भावना बैलगाडा मालकांमध्ये निर्माण झाली. बुधवारी सकाळी शर्यत सुरू होतानाच न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त धडकले आणि बैलगाडा शौकिनांमध्ये खळबळ उडाली. आता असा सण पुन्हा पाहता येणार नाही, यापुढे अनेकांनी बैलगाडा डोळे भरून पाहून घेतले. सातगाव पठार भागातील कारेगाव येथील यात्रेने तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचा समारोप होतो. या वेळी या यात्रेला भावनिक किनार लाभली. मंगळवारी दोनशे बैलगाडे या यात्रेत सहभागी झाले. त्या वेळी शर्यतीवर बंदी येईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. शेतकर्‍यांनी बुधवारी होणार्‍या शर्यतीसाठी जय्यत तयारी केली व मात्र वाहनातून ते शर्यतीसाठी कारेगावला आले. सकाळी ११ वाजता शर्यतीचे उद्घाटन सुरू असताना वृत्तवाहिन्यांवर शर्यतीवरील बंदीचे वृत्त आले. घाटात ही बातमी समजणार कशी. त्या वेळी आढळराव पाटील बैलगाडा विमा योजनेचे अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी हा निर्णय ध्वनिक्षेप हातात घेऊन सांगितला. तेव्हा उपस्थित बैलगाडा मालकांना अक्षरश: झटका बसला. या अनपेक्षित बातमीने त्यांना काहीच सूचेनासे झाले. एरंडे यांनी या वेळी बैलगाडा मालकांना धीर देत यातून मार्ग काढू, अशी ग्वाही दिली. ही शेवटची शर्यत ठरणार असल्याने बैलगाडा मालकांनी धावणारे बैलगाडे अक्षरश: नजरेत साठवून ठेवले. सर्वच बैलगाड्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. मात्र, निसर्गाला ही शर्यत मान्य नसल्यासारखे वातावरण होऊन पाऊस झाला. पन्नास बैलगाडे घाटातून धावल्यानंतर पावसाने शर्यत बंद करावी लागली. ही आपली शेवटची बैलगाडा शर्यत असावी, अशी चर्चा बैलगाडा मालक गटागटाने करीत होते. ४चाकण : गाडामालक व बैलगाडा शौकिनांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा चाकण येथे तीन लाख रुपये खर्च करून नवीन घाट तयार करण्यात आला होता. बौद्ध पौर्णिमेला भैरवनाथमहाराजांची होणारी यात्रा नवीन घाटाच्या रूपाने चांगलीच गाजाणार असल्याचे संकेत मिळू लागले होते पण आता हा घाट शर्यत बंदीमुळे सूनासूनाच राहणार आहे. ४ग्रामीण भागातील गाडामालकांसह गाडा शौकिनांना गाड्यांच्या रूपाने घाटाचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी गोरे-पाटील परिवाराने पुढाकार घेऊन तब्बल तीन लाख रुपये खर्च करून आकर्षक असा नवीन घाट तयार करून घेतला. येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी सखाराम गोरे, ज्ञानेश्वर गोरे, शंकर गोरे व सुदाम गोरे या चार भावंडांनी या नवीन घाटासाठी जागा दिली. चाकण येथील रोहकल रस्त्यावर शेळी-मेंढी बाजार अर्थात खडीमशिनजवळ हा नवीन घाट तयार करण्यात आला. घाटातून पळणारा गाडा इतरत्र वळू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष व पोलीस पाटील वसंतराव गोरे व युवा नेते बाळासाहेब गायकवाड यांनी आवर्जून सांगितले. मात्र आता शर्यती होणार नसल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली.