शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आता घाट सुनासुना

By admin | Updated: May 7, 2014 22:28 IST

आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील बैलगाडा शर्यत ही शेवटची शर्यत असल्याची भावना बैलगाडा मालकांमध्ये निर्माण झाली.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील बैलगाडा शर्यत ही शेवटची शर्यत असल्याची भावना बैलगाडा मालकांमध्ये निर्माण झाली. बुधवारी सकाळी शर्यत सुरू होतानाच न्यायालयाने बंदीवर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त धडकले आणि बैलगाडा शौकिनांमध्ये खळबळ उडाली. आता असा सण पुन्हा पाहता येणार नाही, यापुढे अनेकांनी बैलगाडा डोळे भरून पाहून घेतले. सातगाव पठार भागातील कारेगाव येथील यात्रेने तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचा समारोप होतो. या वेळी या यात्रेला भावनिक किनार लाभली. मंगळवारी दोनशे बैलगाडे या यात्रेत सहभागी झाले. त्या वेळी शर्यतीवर बंदी येईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. शेतकर्‍यांनी बुधवारी होणार्‍या शर्यतीसाठी जय्यत तयारी केली व मात्र वाहनातून ते शर्यतीसाठी कारेगावला आले. सकाळी ११ वाजता शर्यतीचे उद्घाटन सुरू असताना वृत्तवाहिन्यांवर शर्यतीवरील बंदीचे वृत्त आले. घाटात ही बातमी समजणार कशी. त्या वेळी आढळराव पाटील बैलगाडा विमा योजनेचे अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी हा निर्णय ध्वनिक्षेप हातात घेऊन सांगितला. तेव्हा उपस्थित बैलगाडा मालकांना अक्षरश: झटका बसला. या अनपेक्षित बातमीने त्यांना काहीच सूचेनासे झाले. एरंडे यांनी या वेळी बैलगाडा मालकांना धीर देत यातून मार्ग काढू, अशी ग्वाही दिली. ही शेवटची शर्यत ठरणार असल्याने बैलगाडा मालकांनी धावणारे बैलगाडे अक्षरश: नजरेत साठवून ठेवले. सर्वच बैलगाड्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. मात्र, निसर्गाला ही शर्यत मान्य नसल्यासारखे वातावरण होऊन पाऊस झाला. पन्नास बैलगाडे घाटातून धावल्यानंतर पावसाने शर्यत बंद करावी लागली. ही आपली शेवटची बैलगाडा शर्यत असावी, अशी चर्चा बैलगाडा मालक गटागटाने करीत होते. ४चाकण : गाडामालक व बैलगाडा शौकिनांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा चाकण येथे तीन लाख रुपये खर्च करून नवीन घाट तयार करण्यात आला होता. बौद्ध पौर्णिमेला भैरवनाथमहाराजांची होणारी यात्रा नवीन घाटाच्या रूपाने चांगलीच गाजाणार असल्याचे संकेत मिळू लागले होते पण आता हा घाट शर्यत बंदीमुळे सूनासूनाच राहणार आहे. ४ग्रामीण भागातील गाडामालकांसह गाडा शौकिनांना गाड्यांच्या रूपाने घाटाचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी गोरे-पाटील परिवाराने पुढाकार घेऊन तब्बल तीन लाख रुपये खर्च करून आकर्षक असा नवीन घाट तयार करून घेतला. येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी सखाराम गोरे, ज्ञानेश्वर गोरे, शंकर गोरे व सुदाम गोरे या चार भावंडांनी या नवीन घाटासाठी जागा दिली. चाकण येथील रोहकल रस्त्यावर शेळी-मेंढी बाजार अर्थात खडीमशिनजवळ हा नवीन घाट तयार करण्यात आला. घाटातून पळणारा गाडा इतरत्र वळू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष व पोलीस पाटील वसंतराव गोरे व युवा नेते बाळासाहेब गायकवाड यांनी आवर्जून सांगितले. मात्र आता शर्यती होणार नसल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली.