शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

आता शाळांचे मूल्यांकन करणार ‘सॅक’

By admin | Updated: July 1, 2014 02:06 IST

राज्यातील शाळांची श्रेणी निश्चित करेल. परिषदेचे कामकाज व रचना ठरविण्यासाठी अभ्यास गट व कार्यकारी गट तयार करण्यात आले आहेत.

पुणो : देशातील महाविद्यालयांचे मूल्यांकन करणा:या राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) धर्तीवर आता राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (सॅक) स्थापन करण्यात येणार आहे. ही परिषद राज्यातील शाळांची श्रेणी निश्चित करेल. परिषदेचे कामकाज व रचना ठरविण्यासाठी अभ्यास गट व कार्यकारी गट तयार करण्यात आले आहेत. 
शालेय शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने उपस्थित होते. देशातील सर्व विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून त्यांना श्रेणी देण्याचे काम ‘नॅक’द्वारे केले जाते. तर, युरोपीयन देशांमध्ये ‘द ऑफिस फॉर स्टँडर्डस इन एज्युकेशन, चिल्ड्रन्स सव्र्हिसेस अॅन्ड स्कील्स’ (आफस्टेड) ही संस्था तेथील शाळांना भेटी देऊन त्यांचे मूल्यांकन करते. त्यामुळे पालकांना संबंधित शाळेची गुणवत्ता समजते. याच धर्तीवर राज्यातील पालकांनाही शाळेची गुणवत्ता कळावी, त्यानुसार विद्याथ्र्याना संबंधित शाळेत प्रवेश घेण्यास सुलभता यावी यादृष्टीने ‘सॅक’ची रचना केली जाईल, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
‘नॅक’ची कार्यपद्धती, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच इतर केंद्रीय मंडळांच्या शाळांची परीक्षा व मूल्यांकनाची पद्धत याचा अभ्यास करण्यात येईल. तसेच संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे. या अभ्यास गटाची पहिली बैठक आठवडाभरात होईल, असे चोक्कलिंगम म्हणाले. (प्रतिनिधी)
 
खासगी शाळांपासून सुरुवात
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अन्य शासकीय शाळांचे ‘माझी समृद्ध शाळा’ या उपक्रमांतर्गत मूल्यांकन केले जाते. खासगी शाळांबाबत असे मूल्यांकन होत नाही. तसेच राज्यातील शाळांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे ‘सॅक’ची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा खासगी शाळांचे मूल्यांकन करावे लागेल. याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल, असे एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.