शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्राचे देशात आता अकरा विभाग !

By admin | Updated: August 26, 2015 00:54 IST

दमण-दीवसह तीन राज्यांचे मुख्यालय पुण्यात.

अकोला : शेतीचा पाया भक्कम करण्यासाठी अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत नेण्याची खरी गरज असल्याने कृषी मंत्रालयाने कृषी विज्ञान केंद्राचा (केव्हीके)विस्तार व बळकटीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी देशात अकरा विभाग केले असून, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्र, गोवा व गुजरात या तीन राज्यांचे नवे मुख्यालय पुणे येथे सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत सहज पोहोचवता येत असल्याने कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला असून, या केंद्राचे व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी केव्हीकेचे विभाग वाढविण्यात आले आहेत. या अगोदर देशात नऊ विभाग होते. आता अकरा विभाग करण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठे, कृषी संस्थांनी अनेक मोलाचे कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तथापि, हे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शक्य असल्याने देशात नवी १0९ कृषी विज्ञान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. त्याचसोबत या केंद्रांना बळकट करण्यासाठी शास्त्रज्ञांची संख्या ६ वरू न ९ करण्यात आली आहे. या अगोदर त्यांना विषय विशेषज्ञ म्हटले जात होते, आता त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ असे पदनाम देऊन पगारात वाढ करण्यात आली आहे. या वरिष्ठ शास्त्रज्ञांसह या केंद्राच्या इतर २२ तज्ज्ञ कर्मचार्‍यांचे वर्ग वाढविण्यात आले आहे. शेती विकासासाठी कृषी विद्यापीठांसह कृ षी विज्ञान केंद्रे काम करीत असून, विविध शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठीची मोलाची जबाबदारी पार पाडीत आहे. देशात आजमितीस ६४२ कृषी विज्ञान केंद्रे आहेत. यातील ४४ कृषी विज्ञान केंद्रे या राज्यात असून, १३ कृषी विज्ञान केंद्रे ही विदर्भात आहेत. त्यापैकी सात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत तर सहा केंद्रे इतर संस्था चालवित आहेत. कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार संचालनालयामार्फत केव्हीकेचे कामकाज चालते. पुण्यात कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था पुणे येथील विभागाचे कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. या अगोदर हैद्राबाद येथील झोनल कार्यालयांतर्गत महाराष्ट्राचे काम चालत होते.