शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कृषी विज्ञान केंद्राचे देशात आता अकरा विभाग !

By admin | Updated: August 26, 2015 00:54 IST

दमण-दीवसह तीन राज्यांचे मुख्यालय पुण्यात.

अकोला : शेतीचा पाया भक्कम करण्यासाठी अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत नेण्याची खरी गरज असल्याने कृषी मंत्रालयाने कृषी विज्ञान केंद्राचा (केव्हीके)विस्तार व बळकटीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी देशात अकरा विभाग केले असून, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्र, गोवा व गुजरात या तीन राज्यांचे नवे मुख्यालय पुणे येथे सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत सहज पोहोचवता येत असल्याने कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला असून, या केंद्राचे व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी केव्हीकेचे विभाग वाढविण्यात आले आहेत. या अगोदर देशात नऊ विभाग होते. आता अकरा विभाग करण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठे, कृषी संस्थांनी अनेक मोलाचे कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तथापि, हे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवणे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शक्य असल्याने देशात नवी १0९ कृषी विज्ञान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. त्याचसोबत या केंद्रांना बळकट करण्यासाठी शास्त्रज्ञांची संख्या ६ वरू न ९ करण्यात आली आहे. या अगोदर त्यांना विषय विशेषज्ञ म्हटले जात होते, आता त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ असे पदनाम देऊन पगारात वाढ करण्यात आली आहे. या वरिष्ठ शास्त्रज्ञांसह या केंद्राच्या इतर २२ तज्ज्ञ कर्मचार्‍यांचे वर्ग वाढविण्यात आले आहे. शेती विकासासाठी कृषी विद्यापीठांसह कृ षी विज्ञान केंद्रे काम करीत असून, विविध शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठीची मोलाची जबाबदारी पार पाडीत आहे. देशात आजमितीस ६४२ कृषी विज्ञान केंद्रे आहेत. यातील ४४ कृषी विज्ञान केंद्रे या राज्यात असून, १३ कृषी विज्ञान केंद्रे ही विदर्भात आहेत. त्यापैकी सात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत तर सहा केंद्रे इतर संस्था चालवित आहेत. कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार संचालनालयामार्फत केव्हीकेचे कामकाज चालते. पुण्यात कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था पुणे येथील विभागाचे कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. या अगोदर हैद्राबाद येथील झोनल कार्यालयांतर्गत महाराष्ट्राचे काम चालत होते.