शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

राज्यभरात आता २४ तास खा, प्या अन् खरेदीही करा, दुकाने, रेस्टॉरन्ट्स रात्रभर राहणार खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:10 IST

राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.

 विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.या निर्णयाने मुंबईत नाइट लाइफ बिनबोभाट सुरू होणार असे मात्र नाही. मुंबईसह राज्यभर अनेक बंधनेही सरकारने टाकली आहेत. कोणत्या भागात कोणत्या आस्थापना किती वेळ सुरू ठेवायच्या याचा अधिकार पोलीस विभागाला असेल. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. ज्या आस्थापनांमध्ये ५० पेक्षा अधिक महिला काम करतात त्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकांना करावी लागेल. शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाºयांसाठी कँटिनची व्यवस्था करणे अनिवार्य असेल.महिला कर्मचाºयांना रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी ही आस्थापना मालकांची असेल. तसेच प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.सध्याचा नियम काय म्हणतो...सध्या दुकाने, आस्थापना रात्री दहापर्यंत बंद करावी लागतात. १५ मिनिटांची वाढीव वेळ असते. रेस्टॉरंट्स रात्री साडेबारापर्यंत बंद करावी लागतात. एक तास वाढीव वेळ पोलीस परवानगीने घेता येतो. पानटपºया रात्री ११च्या आत, तर व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री साडेनऊला बंद करावी लागतात.विधान परिषदेत परीक्षा बाकीयाच विधेयकात दहापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या लहान आस्थापनांना परवान्यांची गरज नसेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा फायदा ३८ लाख आस्थापनांना होईल आणि इन्स्पेक्टर राज संपुष्टात येणार आहे.या विधेयकातील तरतुदींचे उल्लंघन करणाºया आस्थापना मालकांना तसेच एखाद्या कर्मचाºयाचा अपघात झाल्यास मालकास २ ते ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे.हे विधेयक विधान परिषदेत मंजूर व्हावे लागेल आणि राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.हॉटेलचालक आणि खवय्यांच्या दृष्टीने हा फायदेशीर निर्णय आहे. विशेषत: मुंबईसारख्या शहरांत तीन शिफ्टमध्ये कार्यालये सुरू असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेसही चाकरमान्यांना जेवणाचा पर्याय उपलब्ध असेल.- संतोष शेट्टी, सचिव-आहार२४ तास दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णयाचा फायदा व्यापाºयांसह ग्राहकांनाही होईल. रात्री-अपरात्री घरी परतणाºया ग्राहकांना हवे ते आणि हवे तेव्हा उपलब्ध होईल.- मोहन गुरूनानी, व्यापाºयांचे नेते