शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आता मंत्र्यांचे दौरे नकोत, हाताला काम द्या - आदिवासींची मागणी

By admin | Updated: September 21, 2016 03:31 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कुपोषणावर मात करायची असेल, तर आदिवासी ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे द्या. मंत्र्यांचे दौरे नकोत, आमच्या हाताला कामे द्या, अशी मागणी या ग्रामीण भागातील भूमीपुत्रांनी केली आहे. या भागात फक्त पावसाळी अल्प शेती असते, ही हंगामी संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कुठलेही काम उरत नाही. त्यामुळे स्थलांतरीत व्हावे लागते आहे. शेतीची पिके डिसेंबरमध्ये येतील त्यामुळे आपल्या पोट कसे भरायचे असा प्रश्न येथील आदिवासी बांधवाना सतावत आहे. जव्हार तालुक्यात जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या- २३ हजार ३७ एवढी आहे. तर जॉबकार्डमध्ये नोंद असलेले मजूर ८० हजार ४११ आहेत. या रोहयो मजुरांपैकी सध्या फक्त २५० मजुरांचे रोजगार हमी मार्फत ई- मस्टरे काढून कामे दिली आहेत. यामध्ये कृषी विभाग फळबाग लागवड व वनविभाग रोपे लागवड अशी तालुक्यात दोन ठिकाणी कामे दिल्याची माहिती जव्हार तहसीलदारांकडून मिळाली आहे. जव्हार तालुक्यातील ८० हजार रोहयो मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून रोजगार हमीची कुठलीही कामे मिळाली नाहीत. तर जव्हार, मोखाडा हा डोंगराळ भाग असल्याने या भागात नाचणी, वरई, भात, तूर, उडीद, असा अल्प प्रमाणात पिके घेतली जात आहेत. येथील शेतकऱ्यांचे शेतीचे काम फक्त १५ ते २० दिवसच असते, त्यानंतर येथील मजुरांना कोणतेही हाताला काम नसते, त्यामुळे आजही तालुक्यातील शेकडो रोहयो मजुरांना काम नसल्याने, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मुंब्रा, आदी शहरांकडे शेकडो रोहयो मजूर डोक्यावर बोचका घेवून निघाल्याचे चित्र जव्हारच्या बस स्थानकात दिसत आहेत. त्यामुळे आजही तालुक्यातील शेकडो मजुरांचे स्थलांतर झाल्याचे चित्र आहे. याबाबत मजुरांकडे चौकशी केली असता, की आमचे पावसाळी काम संपल्यानंतर आता आम्हला कुठलेही काम नाही, आम्ही दिवाळीला करायचे काय? आमच्या मुलां बाळांना खायला काय देऊ? अशी प्रतिक्रि या मजुरांकडून ऐकावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार करून येथील लोकांना रोजगाराची अत्यंत गरज आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यचे आदिवासी विकास मंत्री- विष्णू सवरा व पालघर जिल्हाधिकारी- अभिजित बांगर आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी लक्ष घालून मोठ्या प्रमाणात व कायस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.