शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

आता मंत्र्यांचे दौरे नकोत, हाताला काम द्या - आदिवासींची मागणी

By admin | Updated: September 21, 2016 03:31 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कुपोषणावर मात करायची असेल, तर आदिवासी ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे द्या. मंत्र्यांचे दौरे नकोत, आमच्या हाताला कामे द्या, अशी मागणी या ग्रामीण भागातील भूमीपुत्रांनी केली आहे. या भागात फक्त पावसाळी अल्प शेती असते, ही हंगामी संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कुठलेही काम उरत नाही. त्यामुळे स्थलांतरीत व्हावे लागते आहे. शेतीची पिके डिसेंबरमध्ये येतील त्यामुळे आपल्या पोट कसे भरायचे असा प्रश्न येथील आदिवासी बांधवाना सतावत आहे. जव्हार तालुक्यात जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या- २३ हजार ३७ एवढी आहे. तर जॉबकार्डमध्ये नोंद असलेले मजूर ८० हजार ४११ आहेत. या रोहयो मजुरांपैकी सध्या फक्त २५० मजुरांचे रोजगार हमी मार्फत ई- मस्टरे काढून कामे दिली आहेत. यामध्ये कृषी विभाग फळबाग लागवड व वनविभाग रोपे लागवड अशी तालुक्यात दोन ठिकाणी कामे दिल्याची माहिती जव्हार तहसीलदारांकडून मिळाली आहे. जव्हार तालुक्यातील ८० हजार रोहयो मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून रोजगार हमीची कुठलीही कामे मिळाली नाहीत. तर जव्हार, मोखाडा हा डोंगराळ भाग असल्याने या भागात नाचणी, वरई, भात, तूर, उडीद, असा अल्प प्रमाणात पिके घेतली जात आहेत. येथील शेतकऱ्यांचे शेतीचे काम फक्त १५ ते २० दिवसच असते, त्यानंतर येथील मजुरांना कोणतेही हाताला काम नसते, त्यामुळे आजही तालुक्यातील शेकडो रोहयो मजुरांना काम नसल्याने, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मुंब्रा, आदी शहरांकडे शेकडो रोहयो मजूर डोक्यावर बोचका घेवून निघाल्याचे चित्र जव्हारच्या बस स्थानकात दिसत आहेत. त्यामुळे आजही तालुक्यातील शेकडो मजुरांचे स्थलांतर झाल्याचे चित्र आहे. याबाबत मजुरांकडे चौकशी केली असता, की आमचे पावसाळी काम संपल्यानंतर आता आम्हला कुठलेही काम नाही, आम्ही दिवाळीला करायचे काय? आमच्या मुलां बाळांना खायला काय देऊ? अशी प्रतिक्रि या मजुरांकडून ऐकावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार करून येथील लोकांना रोजगाराची अत्यंत गरज आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यचे आदिवासी विकास मंत्री- विष्णू सवरा व पालघर जिल्हाधिकारी- अभिजित बांगर आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी लक्ष घालून मोठ्या प्रमाणात व कायस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.