शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आता मंत्र्यांचे दौरे नकोत, हाताला काम द्या - आदिवासींची मागणी

By admin | Updated: September 21, 2016 03:31 IST

पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कुपोषणावर मात करायची असेल, तर आदिवासी ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे द्या. मंत्र्यांचे दौरे नकोत, आमच्या हाताला कामे द्या, अशी मागणी या ग्रामीण भागातील भूमीपुत्रांनी केली आहे. या भागात फक्त पावसाळी अल्प शेती असते, ही हंगामी संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कुठलेही काम उरत नाही. त्यामुळे स्थलांतरीत व्हावे लागते आहे. शेतीची पिके डिसेंबरमध्ये येतील त्यामुळे आपल्या पोट कसे भरायचे असा प्रश्न येथील आदिवासी बांधवाना सतावत आहे. जव्हार तालुक्यात जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या- २३ हजार ३७ एवढी आहे. तर जॉबकार्डमध्ये नोंद असलेले मजूर ८० हजार ४११ आहेत. या रोहयो मजुरांपैकी सध्या फक्त २५० मजुरांचे रोजगार हमी मार्फत ई- मस्टरे काढून कामे दिली आहेत. यामध्ये कृषी विभाग फळबाग लागवड व वनविभाग रोपे लागवड अशी तालुक्यात दोन ठिकाणी कामे दिल्याची माहिती जव्हार तहसीलदारांकडून मिळाली आहे. जव्हार तालुक्यातील ८० हजार रोहयो मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून रोजगार हमीची कुठलीही कामे मिळाली नाहीत. तर जव्हार, मोखाडा हा डोंगराळ भाग असल्याने या भागात नाचणी, वरई, भात, तूर, उडीद, असा अल्प प्रमाणात पिके घेतली जात आहेत. येथील शेतकऱ्यांचे शेतीचे काम फक्त १५ ते २० दिवसच असते, त्यानंतर येथील मजुरांना कोणतेही हाताला काम नसते, त्यामुळे आजही तालुक्यातील शेकडो रोहयो मजुरांना काम नसल्याने, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मुंब्रा, आदी शहरांकडे शेकडो रोहयो मजूर डोक्यावर बोचका घेवून निघाल्याचे चित्र जव्हारच्या बस स्थानकात दिसत आहेत. त्यामुळे आजही तालुक्यातील शेकडो मजुरांचे स्थलांतर झाल्याचे चित्र आहे. याबाबत मजुरांकडे चौकशी केली असता, की आमचे पावसाळी काम संपल्यानंतर आता आम्हला कुठलेही काम नाही, आम्ही दिवाळीला करायचे काय? आमच्या मुलां बाळांना खायला काय देऊ? अशी प्रतिक्रि या मजुरांकडून ऐकावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार करून येथील लोकांना रोजगाराची अत्यंत गरज आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यचे आदिवासी विकास मंत्री- विष्णू सवरा व पालघर जिल्हाधिकारी- अभिजित बांगर आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी लक्ष घालून मोठ्या प्रमाणात व कायस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.