शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आता ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेवाही ‘पीपीपी’ तत्त्वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 09:37 IST

राज्यात सद्यस्थितीत एकूण ५३ ठिकाणी डायलिसिस सेंटर कार्यरत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे राज्यातील शासकीय रुग्णालयांचे खासगीकरणाचा घाट घातला असताना याला कर्मचाऱ्यांच्या गटाकडून कडाडून विरोध होत आहे. अशा स्थितीत आता राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेवा पीपीपी तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. याकरिता, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असून याला मान्यता मिळाली आहे.

राज्यात सद्यस्थितीत एकूण ५३ ठिकाणी डायलिसिस सेंटर कार्यरत आहेत. या  केंद्रांव्यतिरिक्त राज्यात इतर शासकीय संस्थांमध्ये डायलिसिस सेवेची आवश्यकता लक्षात घेऊन  सद्यस्थितीत १००० खाटांची ५ उपजिल्हा रुग्णालये, ५० खाटांची १३ उपजिल्हा रुग्णालये आणि ३० खाटांचे एक ग्रामीण रुग्णालयामध्ये पीपीपी तत्त्वावर बाययंत्रणेद्वारे डायलिसिस सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. यात आवश्यकतेनुसार अन्य रुग्णालय व  नव्याने कार्यान्वित होणाऱ्या आरोग्य संस्थांचा समावेश प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या मान्यतेविषयी सोमवारी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जीआर काढला आहे.

काय आहेत निर्देश डायलिसिस सेवांच्या निविदा प्रक्रिया राबविताना तांत्रिक समितीद्वारे पडताळण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.  या प्रक्रियेत कोणत्याही विशिष्ट कंपनीला फायदा होणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या रुग्णांव्यतिरिक्त अन्य रुग्णांकडून एका डायलिसिस सत्राकरिता दोनशे रुपये आकारण्यात येतील, हे शुल्क रुग्ण कल्याण समितीमध्ये जमा करण्यात येतील.  या शुल्कामधून सेवा पुरवठादारास या लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी तेवढीच रक्कम अदा करण्यात येणार असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.