शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 9, 2017 07:53 IST

देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे.  राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! असं स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आजपर्यंत सेक्युलर सरकारांचे ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात बसले. मग आता राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्वाचा ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात विराजमान झाला तर बिघडले कुठे? कारण हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडलं आहे. 
 
हिंदुस्थानच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे.   निवडणुकीचे जे वेळापत्रक जाहीर झाले आहे त्यानुसार १४ जुलै रोजी मतदान होईल व २० जुलै रोजी राष्ट्रपती नामक नव्या ‘रबर स्टॅम्प’ची घोषणा केली जाईल. सध्याची आकडेमोड पाहता पंतप्रधान मोदी यांच्याच पसंतीची व्यक्ती ही राष्ट्रपतीपदी विराजमान होईल, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती कितीही अनुभवी असले तरी मार्गदर्शन करण्याशिवाय त्यांच्या हातात तसे दुसरे काहीच नसते. त्यामुळे कश्मीर प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱयांच्या आत्महत्या आदी विषयांवर ते फक्त मार्गदर्शनच करू शकतात. राष्ट्रपती हे तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात, पण म्हणून कश्मीरप्रश्नी ते सेनापतींना युद्धाचे आदेश देऊ शकत नाहीत. अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्रपती थेट जनतेतून निवडून दिले जातात. त्यामुळे ते राष्ट्राचे खऱया अर्थाने कारभारी असतात. हिंदुस्थानी राष्ट्रपतींचे तसे नसते. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते विराजमान असले तरी बऱयाच अर्थाने ते शोभेचेच पद झाले आहे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती भवनात डॉ. अब्दुल कलाम किंवा प्रणव मुखर्जींसारखी व्यक्ती बसली की त्यातल्या त्यात त्या पदाची शान राहते, नाही तर राज्यकर्त्या पक्षास सोयीची असलेली व्यक्ती तेथे ब्रिटिशांच्या बग्गीतून थाटामाटात पाठवली जाते. हा एक थाटामाटाचा जंगी लग्नसोहळाच ठरतो. त्यामुळे येत्या २० जुलैला कुणाच्या डोक्यावर या वरातीचे बाशिंग बांधले जातेय तेच आता पाहायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
राष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेकांनी परस्पर मुंडावळय़ा आणि बाशिंगांची ऑर्डर दिली असली तरी पंतप्रधान मोदींच्या हाताने ज्यास मुंडावळय़ा बांधल्या जातील तोच नवरदेव ठरेल. हळूहळू रिंगण व रिंगणातील खेळाडूंची व्याप्ती वाढेल, पण आम्हाला विचाराल तर आम्ही आजही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर ठाम आहोत असं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
 
देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे. सरसंघचालकांचे मार्गदर्शन एरव्ही देशाला होतच असते, पण घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती पदावरील त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. सरसंघचालक राष्ट्रपती पदावर विराजमान होणे हा आतापर्यंत ज्या विचारांसाठी रा. स्व. संघासह आपण सर्वांनी संघर्ष केला त्या विचारांचा विजय ठरेल. सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.