शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 9, 2017 07:53 IST

देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे.  राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! असं स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आजपर्यंत सेक्युलर सरकारांचे ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात बसले. मग आता राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्वाचा ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात विराजमान झाला तर बिघडले कुठे? कारण हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडलं आहे. 
 
हिंदुस्थानच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे.   निवडणुकीचे जे वेळापत्रक जाहीर झाले आहे त्यानुसार १४ जुलै रोजी मतदान होईल व २० जुलै रोजी राष्ट्रपती नामक नव्या ‘रबर स्टॅम्प’ची घोषणा केली जाईल. सध्याची आकडेमोड पाहता पंतप्रधान मोदी यांच्याच पसंतीची व्यक्ती ही राष्ट्रपतीपदी विराजमान होईल, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती कितीही अनुभवी असले तरी मार्गदर्शन करण्याशिवाय त्यांच्या हातात तसे दुसरे काहीच नसते. त्यामुळे कश्मीर प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱयांच्या आत्महत्या आदी विषयांवर ते फक्त मार्गदर्शनच करू शकतात. राष्ट्रपती हे तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात, पण म्हणून कश्मीरप्रश्नी ते सेनापतींना युद्धाचे आदेश देऊ शकत नाहीत. अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्रपती थेट जनतेतून निवडून दिले जातात. त्यामुळे ते राष्ट्राचे खऱया अर्थाने कारभारी असतात. हिंदुस्थानी राष्ट्रपतींचे तसे नसते. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते विराजमान असले तरी बऱयाच अर्थाने ते शोभेचेच पद झाले आहे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती भवनात डॉ. अब्दुल कलाम किंवा प्रणव मुखर्जींसारखी व्यक्ती बसली की त्यातल्या त्यात त्या पदाची शान राहते, नाही तर राज्यकर्त्या पक्षास सोयीची असलेली व्यक्ती तेथे ब्रिटिशांच्या बग्गीतून थाटामाटात पाठवली जाते. हा एक थाटामाटाचा जंगी लग्नसोहळाच ठरतो. त्यामुळे येत्या २० जुलैला कुणाच्या डोक्यावर या वरातीचे बाशिंग बांधले जातेय तेच आता पाहायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
राष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेकांनी परस्पर मुंडावळय़ा आणि बाशिंगांची ऑर्डर दिली असली तरी पंतप्रधान मोदींच्या हाताने ज्यास मुंडावळय़ा बांधल्या जातील तोच नवरदेव ठरेल. हळूहळू रिंगण व रिंगणातील खेळाडूंची व्याप्ती वाढेल, पण आम्हाला विचाराल तर आम्ही आजही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर ठाम आहोत असं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
 
देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे. सरसंघचालकांचे मार्गदर्शन एरव्ही देशाला होतच असते, पण घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती पदावरील त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. सरसंघचालक राष्ट्रपती पदावर विराजमान होणे हा आतापर्यंत ज्या विचारांसाठी रा. स्व. संघासह आपण सर्वांनी संघर्ष केला त्या विचारांचा विजय ठरेल. सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.